शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

महिन्यातून पंधरा दिवस पाणी बंद

By admin | Updated: June 2, 2016 23:06 IST

अहमदनगर : कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गाचे रुंदीकरण न झाल्याने वाहतुकीच्या कोंडीचा येथील नागरिकांना कायमचा त्रास आहे.

अहमदनगर : कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गाचे रुंदीकरण न झाल्याने वाहतुकीच्या कोंडीचा येथील नागरिकांना कायमचा त्रास आहे. गटारी, खडबडीत रस्ते अशी भिंगारची अवस्था आहे. महिन्यातून पंधरा दिवस पाणीच येत नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. स्वातंत्र्य मिळाले मात्र ड्रेनेजलाईन मिळाली नाही, अशी संतापजनक भावना नागरिकांनी व्यक्त केली.‘लोकमत आपल्या दारी’ टीमने गुरुवारी सकाळी भिंगार मधील मारुती मंदिरासमोर ज्येष्ठ नागरिक आणि वाघस्कर गल्लीतील महिलांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिंगारच्या दुर्दशेबद्दलचे वास्तव लोकमत टीमला सांगितले. कल्याण-विशाखापट्टणम् महामार्ग रुंदीकरणाबाबत अद्याप ठोस कार्यवाही होत नसल्याने भिंगारची कोंडी झाली आहे. अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणे काढण्याबाबत छावणी परिषदेकडून कारवाई होत नसून तेथील अधिकारी वर्ग निर्ढावला असल्याने नागरिकांची समस्या ऐकून घेण्याची तसदी घेतली जात नाही. छावणी परिषदेचे अधिकारी आणि सदस्यही समस्यांबाबत गंभीर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिन्यातील फक्त पंधरा दिवस पाणी येते. हे पाणीही कमी दाबाने येते़ त्यामुळे नागरिकांना पाणीही मिळत नाही़ तसेच पंधरा मिनिटेच पाणी असते. त्यातही पहिले पाच मिनिटे नळाला दूषित (पिवळ््या रंगाचे) पाणी येते. या पाण्याला दुर्गंधी असते. घाण पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वाघस्कर गल्ली येथील सार्वजनिक विहीर बंद केली आहे. विहिरीचे पाणी लोकांना उपलब्ध करून दिले तर नागरिकांना पाणी उपलब्ध होईल. गटारीचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली.भिंगारचा चटई क्षेत्राचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. खासदार दिलीप गांधी यांनी केवळ आश्वासने दिली, मात्र त्याची पूर्तता केली नाही. रस्त्याचे रुंदीकरण व्हावे. अतिक्रमणे हटवून रस्त्यांचा श्वास मोकळा करावा. अद्याप चटई क्षेत्र मंजूर नसल्याने भिंगारमध्ये नव्या बांधकामाला परवानगी दिली जात नाही. पैसे दिले की सर्व अवैध कामे छावणी मंडळाचे अधिकारी करतात. त्यांच्यावर ट्रॅप लावायचे ठरवले तरी राज्यातील एसीबीचा ट्रॅप त्यांच्या कायद्यात बसत नाही. छावणी परिषदेच्या जाचक अटीमुळे लोक भिंगार सोडून जात आहेत. ६० टक्के लोकांची घरे त्यांच्या नावावर झाली नाहीत.-मतीन सय्यद,भिंगारगटारी, पुरेशे पाणी, रस्ते अशा मूलभूत समस्या सोडवाव्यात. नाले सफाई व्हावी. जुने शहर असल्याने त्यात सुधारणा व्हाव्यात.- शिवाजी कौसे