शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

विश्वस्त मंडळ सरकारच्या की भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी?

By admin | Updated: August 12, 2016 23:57 IST

प्रमोद आहेर, शिर्डी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थान विश्वस्तांनी सरकारच्या अगोदर भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले तरच नैतिकदृष्ट्या सार्इंचे विश्वस्त म्हणवून घेता येइल़

प्रमोद आहेर, शिर्डीशताब्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थान विश्वस्तांनी सरकारच्या अगोदर भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले तरच नैतिकदृष्ट्या सार्इंचे विश्वस्त म्हणवून घेता येइल़ भाविकांच्या श्रद्धेचा उपयोग सामाजिक कामासाठीच व्हायला हवा, मात्र त्यांच्या श्रद्धेचा आदर ठेवून अशी सर्वसामान्याची अपेक्षा आहे़शासनाला वैद्यकीय कामांसाठी निधी देण्यापेक्षा सार्इंचा वारसा चालवणारा रूग्णसेवेचा आणखी विस्तार करून मेडिकल, नर्सिंग महाविद्यालये, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करणेही सरकारला मदत केल्यासारखेच आहे़पाचशेवर खाटा असलेल्या संस्थान रूग्णालयाची कितीही अबाळ झाली असली तरी जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भ, मराठवाड्यातील गोरगरीब रूग्णांसाठी हा हक्काचा आधार आहे़ गेल्या वर्षी संस्थान रूग्णालयात ४ लाख ४६ हजार रूग्णांवर उपचार झाले, पंचवीस हजार रूग्ण अ‍ॅडमीट झाले, २० हजार ४४२ रूग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या़ सुपरस्पेशालीटीच्या रूपाने कार्डीयाक व न्युरो विभागात गेल्या दहा वर्षात एक लाखाहून अधिक रूग्णांवर माफक दरात उपचार झाले़ रूग्णालयावर गेल्या वर्षी संस्थानने ९१ कोटी रूपये खर्च केले़ अन्य ठिकाणी उपचार घेणाऱ्या ४७,६५५ गरीब रूग्णांना ७ कोटी ३१ लाखांची वैद्यकीय मदत केली़संस्थानच्या २ हजार ८७१ खोल्या, हॉलचा वर्षभरात ५९ लाख २४ हजार तर प्रसादालयात १ कोटी ३० लाख भाविकांनी लाभ घेतला़ वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के इतकी ही संख्या व त्यांच्या सुविधा, भावना दुर्लक्षित करता येणार नाहीत़दर्शन सुविधेचा वाईट अनुभव आलेल्या सुरेश हावरे यांनी तीन वर्षापूर्वी शिर्डीला पुन्हा न येण्याचा निर्धार केला होता. अन्य भाविकांची अशा कटू अनुभवातून सुटका व्हावी, याकरताच कदाचित त्यांना साईकृपेने अध्यक्ष पदाची संधी मिळाली असेल़ त्यांनी आता भाविकांचे दर्शन व वास्तव्य कसे आनंददायी होईल यावर लक्ष द्यायला हवे़उन्हाळ्यात पाण्याअभावी भक्तनिवास बंद ठेवले, भाविक पत्रावळीवर जेवले, दर्शनरांगेत उन्हातान्हात भाविक लेकराबाळांना घेऊन उभा असतो, मान्यतेअभावी मंदिर परिसरातील फरशी बदलता येत नाही, शहरातील रस्ते अर्धवट आहेत, स्वच्छतागृहे नाहीत, अनेक प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत याबाबत संस्थानकडे पैसे मागणारांना काही करावसं वाटत नाही़ (समाप्त)संस्थान रूग्णालय गोरगरिबांसाठी वरदान आहे, ते अद्ययावत करायचे सोडून सरकारला आरोग्यासाठी निधी देणे दुर्दैव आहे, शिर्डी ग्रामस्थांचा याला विरोध असेल, याबाबत व्यवस्थापनाला जाब विचारू़ -कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, माजी विश्वस्त़सरकार भक्तांचा पैसा लुटण्याच्या प्रयत्नात आहे़ सरकारने जनतेच्या कामांसाठी शासकीय पैसा वापरावा, भक्तांच्या पैशाची आम्ही लूट करू देणार नाही़-दत्तात्रय कोते, मनसे जिल्हाध्यक्ष़