शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मूळा धरणातील विष प्रयोगाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:18 IST

मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल धरणातील पाणीसाठा शुद्ध ठेवण्यासाठी धोरण ठरणार

भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुळा धरणातील विषप्रयोग निदर्शनास आल्यानंतर राज्यातील इतरही धरणांमधील पाणी साठ्यांमध्ये असा विषप्रयोग होऊ नये, यासाठी राज्य पातळीवरील धोरणच ठरविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी झालेल्या बैठकीत मुळा धरण प्रकरणाची दखल घेण्यात आली. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे यांच्या सूचनेवरून मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत प्रधान सचिव अनिल डिकीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. विखे यांनी बैठकीत गांभीर्याने विषय मांडतांना सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील मुळा हे सर्वात मोठे धरण आहे. त्याचा २५ लाख लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात़ मुळा धरणातील मासेमारीमुळे माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ धरणात आंतरराष्ट्रीय पध्दतीच्या मासेमारी तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज विखे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, धरणातील पाणी साठा शुध्द राहिला पाहिजे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल़ धरणातील पाणी दूषित करणे हा गंभीर गुन्हा आहे़ स्पेशल टास्क फोर्सव्दारे कारवाई केली जाईल. राज्यातही मुळा धरणाचा पॅटर्न राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.मुळा धरणात मासेमारीसाठी विषप्रयोग होत असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कारवाईचा आदेश दिला होता. त्यानुसार बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून धरण परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी