शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मूळा धरणातील विष प्रयोगाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:18 IST

मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल धरणातील पाणीसाठा शुद्ध ठेवण्यासाठी धोरण ठरणार

भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुळा धरणातील विषप्रयोग निदर्शनास आल्यानंतर राज्यातील इतरही धरणांमधील पाणी साठ्यांमध्ये असा विषप्रयोग होऊ नये, यासाठी राज्य पातळीवरील धोरणच ठरविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी झालेल्या बैठकीत मुळा धरण प्रकरणाची दखल घेण्यात आली. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे यांच्या सूचनेवरून मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत प्रधान सचिव अनिल डिकीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. विखे यांनी बैठकीत गांभीर्याने विषय मांडतांना सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील मुळा हे सर्वात मोठे धरण आहे. त्याचा २५ लाख लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात़ मुळा धरणातील मासेमारीमुळे माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ धरणात आंतरराष्ट्रीय पध्दतीच्या मासेमारी तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज विखे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, धरणातील पाणी साठा शुध्द राहिला पाहिजे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल़ धरणातील पाणी दूषित करणे हा गंभीर गुन्हा आहे़ स्पेशल टास्क फोर्सव्दारे कारवाई केली जाईल. राज्यातही मुळा धरणाचा पॅटर्न राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.मुळा धरणात मासेमारीसाठी विषप्रयोग होत असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कारवाईचा आदेश दिला होता. त्यानुसार बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून धरण परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी