शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वृक्षे गेली वाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST

नवीन रस्त्यावरील झाडांची कत्तल केल्यानंतर वृक्षप्रेमींनी आवाज उठवला. त्यानंतर राजूर ते बारीदरम्यानच्या रस्त्यावर यावर्षी पावसाळ्यात जंगली झाडे लावण्यात आली. ...

नवीन रस्त्यावरील झाडांची कत्तल केल्यानंतर वृक्षप्रेमींनी आवाज उठवला. त्यानंतर राजूर ते बारीदरम्यानच्या रस्त्यावर यावर्षी पावसाळ्यात जंगली झाडे लावण्यात आली. पाऊस पडत असल्याने त्यावेळी ही झाडे हिरवीगार दिसत होती. मात्र, झाडांभोवती काटेरी कुंपण घालण्यात आले नव्हते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जनावरे चारली जात असल्याने यातील काही झाडे जनावरांनी खाल्ली होती. तरीही यातील काही झाडांना पुन्हा पालवी फुटली होती.

पावसाळा संपला आणि संबंधितांचे या झाडांकडे दुर्लक्ष होऊ लागले. मुरमाड जागेवर असलेली अनेक झाडे वेळेत पाणी मिळत नसल्याने वाळून गेली आहेत. तर उंची असलेली लावण्यात आलेल्या अनेक झाडांना आधार दिला नसल्याने वाचलेल्या काही झाडांचे शेंडे जमिनीला टेकले आहेत. अनेक ठिकाणी काही अंतरावरील झाडे वाळून गेल्याने रस्त्याची एक बाजू उजाड दिसू लागली आहे. वड, पिंपळ, कडुलिंब काही जंगली झाडे अद्यापही सुस्थितीत आहे. या झाडांना वेळेत पाणी देण्यात यावे. त्यांना काटेरी कुंपण करण्यात यावे. वाळलेल्या झाडांच्या जागेवर पुन्हा नव्याने झाडे लावण्यात यावी, अशी मागणी निसर्ग प्रेमी करत आहेत.

..............

या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी गरज नसतानाही काही झाडे तोडण्यात आली. शेकडो वर्षांची ही निसर्ग संपदा लोप पावली. यानंतर पावसाळ्यात झाडे लावण्याचा प्रयत्न झाला. हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असला तरी या झाडांची काळजी घेतली गेली नसल्याने यातील अनेक झाडे वाळून गेली. जिवंत असलेल्या झाडांना किमान सहा दिवसांतून एकदा पाणी मिळाले तरच ही झाडे जगातील अन्यथा हा रस्ता उजाड दिसेल.

- रमाकांत डेरे, वृक्षप्रेमी

१६ राजूर