शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षापासून कर्जत तहसीलदारांचा दुचाकीवरुन प्रवास; चारचाकी वाहन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:18 IST

गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.

कर्जत : गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून असून नव्या वाहनाच्या प्रतीक्षेत कर्जतचे तहसीलदार व तहसील कार्यालयातील कर्मचारी आहेत.कर्जत तहसील कार्यालयास नवीन प्रशस्त इमारत मिळाली. यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेची मोठी सोय झाली. एका छताखाली सर्व कामे होऊ लागली. मात्र कर्जत येथील तहसीलदार कार्यालयाला गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. पूर्वीची कालबाह्य झालेली गाडी शेडमध्ये लाऊन ठेवली आहे. यामुळे या गाडीवर खूप मोठ्या प्रमाणात धूळ साठली आहे. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार हे तेथील सर्वेसर्वा असतात, अशा जबाबदार अधिकाºयांना गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. यामुळे ते दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. काही वेळेस खासगी भाडोत्री वाहन वापरत आहेत. तर कधी इतर शासकीय वाहनातून प्रवास करीत आहेत. कर्जत तालुक्यातील एका टोकाला भिमा नदी आहे तर दुसरीकडे सीना नदी आहे. या दोन्ही ठिकाणी वाळूतस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत. याठिकाणी कारवाई करताना तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठी कसरत होते. वाळूतस्कर अत्याधुनिक गाड्यावर असतात. तर कर्जतचे तहसीलदार भाडोत्री वाहनात असतात. त्यांना कसलीच सुरक्षीतता नसते. अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून वाळूतस्करी करणाºयांवर कारवाई करतात. विशेष बाब म्हणजे प्रत्येक वर्षी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जादा महसूल शासनाला जमा करून देत आहेत.गेल्या वर्षी कर्जत तालुका महसूल वसुलीत अहमदनगर जिल्ह्यात दुसरा आला होता. मात्र कर्जत तहसील कार्यालयास चार चाकी गाडी नाही ही मोठी शोकांतिका आहे. कोट्यवधी रूपयांचा महसूल शासनाकडे जमा केला, मात्र काही लाख रुपये किमतीची गाडी मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. वाळू तस्कर अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी येणा-या पथकावर हल्ले करतात अशी घटना अद्याप कर्जत तालुक्यात घडली नाही. दुर्दैवाने घडलीच तर याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे. चारचाकी नसल्याने अनेक वेळा अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खचते. याशिवाय इतर कामांसाठी तालुक्यातील विविध ठिकाणी फिरताना त्यांना मर्यादा पडत आहेत. कर्जतचे न्याय दंडाधिकारीच न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना कोण व कधी न्याय मिळवून देतील याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमच्या कार्यालयाला गाडी नाही. याबाबतचा प्रस्ताव २०१२ मध्येच वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. आम्ही आमची कामे पूर्ण करीत आहोत. कर्जत तहसीलदारांना चारचाकी वाहन कधी द्यायचे याचा निर्णय वरिष्ठ घेतील. याबद्दल आम्ही काही बोलणार नाही.-किरण सावंत पाटील, तहसीलदार, कर्जत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत