शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सहा वर्षापासून कर्जत तहसीलदारांचा दुचाकीवरुन प्रवास; चारचाकी वाहन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:18 IST

गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.

कर्जत : गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून असून नव्या वाहनाच्या प्रतीक्षेत कर्जतचे तहसीलदार व तहसील कार्यालयातील कर्मचारी आहेत.कर्जत तहसील कार्यालयास नवीन प्रशस्त इमारत मिळाली. यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेची मोठी सोय झाली. एका छताखाली सर्व कामे होऊ लागली. मात्र कर्जत येथील तहसीलदार कार्यालयाला गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. पूर्वीची कालबाह्य झालेली गाडी शेडमध्ये लाऊन ठेवली आहे. यामुळे या गाडीवर खूप मोठ्या प्रमाणात धूळ साठली आहे. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार हे तेथील सर्वेसर्वा असतात, अशा जबाबदार अधिकाºयांना गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. यामुळे ते दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. काही वेळेस खासगी भाडोत्री वाहन वापरत आहेत. तर कधी इतर शासकीय वाहनातून प्रवास करीत आहेत. कर्जत तालुक्यातील एका टोकाला भिमा नदी आहे तर दुसरीकडे सीना नदी आहे. या दोन्ही ठिकाणी वाळूतस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत. याठिकाणी कारवाई करताना तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठी कसरत होते. वाळूतस्कर अत्याधुनिक गाड्यावर असतात. तर कर्जतचे तहसीलदार भाडोत्री वाहनात असतात. त्यांना कसलीच सुरक्षीतता नसते. अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून वाळूतस्करी करणाºयांवर कारवाई करतात. विशेष बाब म्हणजे प्रत्येक वर्षी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जादा महसूल शासनाला जमा करून देत आहेत.गेल्या वर्षी कर्जत तालुका महसूल वसुलीत अहमदनगर जिल्ह्यात दुसरा आला होता. मात्र कर्जत तहसील कार्यालयास चार चाकी गाडी नाही ही मोठी शोकांतिका आहे. कोट्यवधी रूपयांचा महसूल शासनाकडे जमा केला, मात्र काही लाख रुपये किमतीची गाडी मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. वाळू तस्कर अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी येणा-या पथकावर हल्ले करतात अशी घटना अद्याप कर्जत तालुक्यात घडली नाही. दुर्दैवाने घडलीच तर याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे. चारचाकी नसल्याने अनेक वेळा अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खचते. याशिवाय इतर कामांसाठी तालुक्यातील विविध ठिकाणी फिरताना त्यांना मर्यादा पडत आहेत. कर्जतचे न्याय दंडाधिकारीच न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना कोण व कधी न्याय मिळवून देतील याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमच्या कार्यालयाला गाडी नाही. याबाबतचा प्रस्ताव २०१२ मध्येच वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. आम्ही आमची कामे पूर्ण करीत आहोत. कर्जत तहसीलदारांना चारचाकी वाहन कधी द्यायचे याचा निर्णय वरिष्ठ घेतील. याबद्दल आम्ही काही बोलणार नाही.-किरण सावंत पाटील, तहसीलदार, कर्जत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत