शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

सहा वर्षापासून कर्जत तहसीलदारांचा दुचाकीवरुन प्रवास; चारचाकी वाहन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:18 IST

गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.

कर्जत : गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून असून नव्या वाहनाच्या प्रतीक्षेत कर्जतचे तहसीलदार व तहसील कार्यालयातील कर्मचारी आहेत.कर्जत तहसील कार्यालयास नवीन प्रशस्त इमारत मिळाली. यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेची मोठी सोय झाली. एका छताखाली सर्व कामे होऊ लागली. मात्र कर्जत येथील तहसीलदार कार्यालयाला गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. पूर्वीची कालबाह्य झालेली गाडी शेडमध्ये लाऊन ठेवली आहे. यामुळे या गाडीवर खूप मोठ्या प्रमाणात धूळ साठली आहे. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार हे तेथील सर्वेसर्वा असतात, अशा जबाबदार अधिकाºयांना गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. यामुळे ते दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. काही वेळेस खासगी भाडोत्री वाहन वापरत आहेत. तर कधी इतर शासकीय वाहनातून प्रवास करीत आहेत. कर्जत तालुक्यातील एका टोकाला भिमा नदी आहे तर दुसरीकडे सीना नदी आहे. या दोन्ही ठिकाणी वाळूतस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत. याठिकाणी कारवाई करताना तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठी कसरत होते. वाळूतस्कर अत्याधुनिक गाड्यावर असतात. तर कर्जतचे तहसीलदार भाडोत्री वाहनात असतात. त्यांना कसलीच सुरक्षीतता नसते. अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून वाळूतस्करी करणाºयांवर कारवाई करतात. विशेष बाब म्हणजे प्रत्येक वर्षी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जादा महसूल शासनाला जमा करून देत आहेत.गेल्या वर्षी कर्जत तालुका महसूल वसुलीत अहमदनगर जिल्ह्यात दुसरा आला होता. मात्र कर्जत तहसील कार्यालयास चार चाकी गाडी नाही ही मोठी शोकांतिका आहे. कोट्यवधी रूपयांचा महसूल शासनाकडे जमा केला, मात्र काही लाख रुपये किमतीची गाडी मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. वाळू तस्कर अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी येणा-या पथकावर हल्ले करतात अशी घटना अद्याप कर्जत तालुक्यात घडली नाही. दुर्दैवाने घडलीच तर याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे. चारचाकी नसल्याने अनेक वेळा अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खचते. याशिवाय इतर कामांसाठी तालुक्यातील विविध ठिकाणी फिरताना त्यांना मर्यादा पडत आहेत. कर्जतचे न्याय दंडाधिकारीच न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना कोण व कधी न्याय मिळवून देतील याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमच्या कार्यालयाला गाडी नाही. याबाबतचा प्रस्ताव २०१२ मध्येच वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. आम्ही आमची कामे पूर्ण करीत आहोत. कर्जत तहसीलदारांना चारचाकी वाहन कधी द्यायचे याचा निर्णय वरिष्ठ घेतील. याबद्दल आम्ही काही बोलणार नाही.-किरण सावंत पाटील, तहसीलदार, कर्जत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत