शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वैचारिक समृद्धीमुळेच गावाचे परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST

अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजारमधील परिवर्तन आर्थिक समृद्धीपेक्षाही वैचारिक समृद्धीने आले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी ...

अहमदनगर : आदर्श गाव हिवरेबाजारमधील परिवर्तन आर्थिक समृद्धीपेक्षाही वैचारिक समृद्धीने आले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी केेेले. ढुमे यांनी गुरुवारी आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिली. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते.

ढुमे म्हणाले, हिवरे बाजार गावाविषयी जे ऐकले होते, त्यापेक्षा प्रत्यक्षात खूप वेगळेपण अनुभवयास मिळाले. अनेक गावांत आर्थिक समृद्धी आली. परंतु, तेथे गुन्हेगारीही वाढली. म्हणून वैचारिक समृद्धी हवी असेल तर पेनाची (शैक्षणिक ताकद) वाढली पाहिजे. त्याचवेळी बंदुकीची गरज संपेल. हिवरेबाजार येथील जलसंधारण, पाण्याचे नियोजन व दुग्धव्यवसायातील भरारी, पिकांचे नियोजन तसेच श्रमशक्तीची ताकद या जोरावरच या गावात वैचारिक समृद्धी आली आहे. त्यातूनच आर्थिक समृद्धी आली. या गावातील बदल म्हणजे आधुनिक काळातील भगीरथ प्रयत्न आहे. उद्याचा सक्षम भारत घडवायचा असेल तर हिवरेबाजारसारख्या आर्थिक समृद्धीबरोबरच वैचारिक समृद्धीची गरज आहे.

--

फोटो- १० हिवरेबाजार