शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

रात्री १२ पर्यंत चालल्या शिक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 16, 2016 00:07 IST

अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत.

अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत ४११ शिक्षकांच्या पेसा, समानीकरण आणि विनंती बदल्या झाल्या आहेत. अवघ्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी डोळ्यात तेल घालत, बदल्यांच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवत आहेत. सर्वांत मोठा विभाग असणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाची बदली प्रक्रिया किचकट प्रक्रियेमुळे वेळखाऊपणाची झाली. यात काही तालुक्यांनी परिपूर्ण माहिती सादर न केल्याने काही प्रकारातील बदल्या स्थगित ठेवण्यात आल्या. शनिवारी दिवसभर आणि रात्री १२ पर्यंत पेसामधून ५६ शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. तर तेवढेच शिक्षक पुन्हा पेसात पाठवण्यात आले. ३४ शिक्षकांची समानीकरणात बदली करण्यात आली असून २६५ शिक्षकांनी आपसी बदलीचा फायदा घेतला. या बदल्यांची प्रक्रिया मोठी असल्याने त्यासाठी अधिक वेळ लागला. शनिवारी रात्रीच कोणत्याही परिस्थितीत बदल्या पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे बदली पात्र शिक्षकांना १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत थांबावे लागले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सामान्य प्रशासन विभागाचे अशोक व्यवहारे, ऋषिकेश बोरूडे प्रक्रिया राबवत होते. रविवारी आरोग्य विभागाच्या स्थगिती दिलेल्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात आरोग्य सेवक पुरुष १४ पेसा, १३ समानीकरण, १ आपसी बदली, आरोग्य सेविका महिला १८ पेसा, १४ समानीकरण, १० आपसी बदल्या राबवण्यात आल्या. सुट्टी असताना जिल्हा परिषदेत गर्दी होती. (प्रतिनिधी)