शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रात्री १२ पर्यंत चालल्या शिक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 16, 2016 00:07 IST

अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत.

अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत ४११ शिक्षकांच्या पेसा, समानीकरण आणि विनंती बदल्या झाल्या आहेत. अवघ्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी डोळ्यात तेल घालत, बदल्यांच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवत आहेत. सर्वांत मोठा विभाग असणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाची बदली प्रक्रिया किचकट प्रक्रियेमुळे वेळखाऊपणाची झाली. यात काही तालुक्यांनी परिपूर्ण माहिती सादर न केल्याने काही प्रकारातील बदल्या स्थगित ठेवण्यात आल्या. शनिवारी दिवसभर आणि रात्री १२ पर्यंत पेसामधून ५६ शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. तर तेवढेच शिक्षक पुन्हा पेसात पाठवण्यात आले. ३४ शिक्षकांची समानीकरणात बदली करण्यात आली असून २६५ शिक्षकांनी आपसी बदलीचा फायदा घेतला. या बदल्यांची प्रक्रिया मोठी असल्याने त्यासाठी अधिक वेळ लागला. शनिवारी रात्रीच कोणत्याही परिस्थितीत बदल्या पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे बदली पात्र शिक्षकांना १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत थांबावे लागले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सामान्य प्रशासन विभागाचे अशोक व्यवहारे, ऋषिकेश बोरूडे प्रक्रिया राबवत होते. रविवारी आरोग्य विभागाच्या स्थगिती दिलेल्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात आरोग्य सेवक पुरुष १४ पेसा, १३ समानीकरण, १ आपसी बदली, आरोग्य सेविका महिला १८ पेसा, १४ समानीकरण, १० आपसी बदल्या राबवण्यात आल्या. सुट्टी असताना जिल्हा परिषदेत गर्दी होती. (प्रतिनिधी)