शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

कोपरगाव कारागृहातील ७७ आरोपींची हर्सुल व नाशिकरोड जेलमध्ये रवानगी

By सचिन धर्मापुरीकर | Updated: August 20, 2023 19:43 IST

इमारत बांधण्यासाठी कारागृह केले रिकामे

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव कारागृहातील कैद्यांची अतिरिक्त झालेली संख्या पाहता कारागृह प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ७७ कैदींना संभाजीनगर येथील हर्सुल व नाशिक रोड कारागृहात हलविण्यात आले. शनिवारी व रविवारी अशी दोन टप्प्यात आरोपींची रवानगी करण्यात आली.

कोपरगाव येथील कारागृहाची वास्तू ही ७० वर्षापूर्वीची आहे. या कारागृहातील सर्व बराकींकींची अवस्था ही अत्यंत खराब झालेली आहे. त्याची दुरुस्ती ही मुदतीत होणे गरजेचे आहे. तात्पुर्त्या स्वरुपात कारागृहाची दुरुस्ती करून मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना दि. २० जानेवारी रोजी कळविण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पत्र देऊन दुरुस्तीच्या कामास मंजूरी प्राप्त करुन जेलची इमारत दुरुस्तीसाठी तीन महिन्याचा  कालावधी लागणार असून त्यासाठी जेलची इमारत रिकामी करुन ताब्यात मिळण्याची मागणी केली.  त्यानुसार जेलचे अधिक्षक तथा तहसिलदार संदिपकुमार भोसले यांनी दि. १५ जुलै २०२३ रोजी कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग येरवडा पुणे यांना जेलमधील सर्व ७७ आरोपींना अन्यत्र वर्ग करण्याची परवानगी मिळावी असा लेखी प्रस्ताव पाठविला होता.  पुणे विभागाचे डी. आय. जी. यांचेकडून दि. १४ ऑगस्ट रोजी मंजूरी आल्यानंतर तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांना पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी केली. होती.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रदिप देशमुख यांनी तातडीने अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयाकडून पोलीस व्हॅनची मागणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी ७७ आरोपींना घेऊन जाण्यासाठी दोन पोलीस अधिकारी व ८० पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन दिले.

कोपरगाव दुय्यम कारागृहात सध्या दाखल असलेल्या गंभीर गुन्हयांतील खून, लव्ह जिहाद प्रकरण, दरोडा, रस्तालूट, शिर्डीतील ठेवीदारांची फसवणूक केलेले सर्व आरोपी, बलात्कार, मुलींना फूस लावून पळवून नेणे, इ. गुन्ह्यातील पाच पोलीस स्टेशनच्या गुन्हयांतील ३७ आरोपींची सेंट्रल जेल, हर्सल छ. संभाजीनगर येथे दि. १९ रोजी तर २० ऑगस्ट रोजी नाशिक रोड येथील सेंट्रल जेलमध्ये अशा एकूण ७७ आरोपींची रवानगी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली असल्याची माहिती तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.