शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

पर्यटनाकरिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:22 IST

श्रीरामपूर : नगर जिल्ह्याचे भविष्यातील वाढते औद्योगिकीकरण व धार्मिक पर्यटन क्षेत्रातील वाव लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबईकरिता अधिकाधिक ...

श्रीरामपूर : नगर जिल्ह्याचे भविष्यातील वाढते औद्योगिकीकरण व धार्मिक पर्यटन क्षेत्रातील वाव लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबईकरिता अधिकाधिक रेल्वे गाड्या सुरू कराव्या अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. या मागणीला अनुसरून रेल्वे प्रशासनाने साईनगर- पुणे-दादर एक्सप्रेस सुरू केल्याने या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले.

प्रवासी भवनमध्ये आयोजित केलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड होते. प्रास्तविक सचिव अनिल कुलकर्णी यांनी केले. आगार प्रमुख राकेश शिवदे, प्रा.गोरख बारहाते, वाहतूक अधीक्षक किरण शिंदे, उद्योजक चेतन भुतडा, दिलीप इंगळे, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक अंबादास ढोकचौळे, पुरुषोत्तम मुळे, सुरेशचंद्र बाठीया आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पुढील १५ वर्षे मुंबई प्रवासाची गरज लक्षात घेता रेल्वे गाड्यांची आवश्यकता भासणार आहे. रात्री धावणारी व सकाळी मुंबई येथे सोडणारी नागरिकांच्या सोयीची रेल्वे सुरु करण्याची प्रवासी संघटनेची मागणी होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता व विभागीय वाणिज्य प्रबंधक प्रदिप हिरडे यांनी ही सूचना मान्य केली होती. संघटनेच्या मागणीला यश येऊन आठवड्यातून चार दिवस दादर-पुणे- साईनगर व तीन दिवस दादर-पंढरपूर रेल्वेचा मार्ग मोकळा होऊन ११ मार्चपासून रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे श्रीगोड यांनी सांगितले.

बैठकीस अमिता आहेर, सुनील सुतावणे, प्रकाश गदिया, मुळचंद छतवाणी, अरुण बागुल, विजय नगरकर, वासुदेव काळे, दत्तात्रय काशीद, गणेश वाघ, संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते. प्रवासी संघटनेच्या अजीव सदस्यपदी चेतन भुतडा, दिलीप इंगळे, अरुण बागुल, मुळचंद छतवाणी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

----