क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताचे आव्हान ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट (टी-२०) सामन्यांच्या बंदोबस्ताचे आपल्यासमोर मोठे आव्हान असल्याचे रोकडे म्हणाले. जामठा स्टेडियमवर एकूण चार सामने आहेत. सामन्यांच्या तारखा आणि पोलिसांची भरती लागूनच असल्याने जास्त ताण येणार असल्याचे ते म्हणाले. एकूण सामन्यांपैकी १५ आणि २५ मार्चच्या सामन्याचा बंदोबस्त आव्हानात्मक आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेता बॉम्बशोधक आणि नाशक पथकासह कडक बंदोबस्त ठेवू, असे ते म्हणाले. सामन्याच्या निमित्ताने होणारी गर्दी, वाहतुकीची समस्या कशी मार्गी लावायची, त्याचे प्लॅनिंग सुरू आहे. त्यासाठी जामठ्याला दोनदा भेटी दिल्या आहेत. मैदानासमोर मोठ्या संख्येत वाहने येतात अन् परत फिरतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. हे लक्षात घेता येणारी वाहने तशीच पुढे काढून हिंगणा वळण मार्गाने मुख्य मार्गाला जोडण्याची योजना आहे. त्यासाठी तीन किलोमीटरच्या मार्गाची डागडुजी करावी लागणार आहे. तसे झाल्यास वाहतुकीची कोंडी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हीसीएकडे पोलिसांची २०१२ पासूनची बंदोबस्ताची मोठी रक्कम थकीत आहे, ती वसूल करण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याचे लक्षात आणून दिले असता आपण ती माहिती घेत वसुलीची कारवाई करू, असेही अधीक्षक रोकडे म्हणाले. ---
शिक्षक बँकेसाठी आज मतदान
By admin | Updated: February 27, 2016 23:34 IST