शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत आज तोडगा

By admin | Updated: October 27, 2023 16:19 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेतला होता.

अहमदनगर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेतला होता. त्यानुसार गुरूवारी (दि.११) काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तिन्ही मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी १४ तारखेला होणाऱ्या पंचायत समिती पदाधिकारी आणि २१ तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीबाबात चर्चा होऊन निर्णय होणार आहे.जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवित, ऐनवेळी सेना-भाजपासोबत घरोबा करत काँग्रेसला सत्तेपासून लांब ठेवले होते. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. जिल्हा परिषदेत सर्वाधिक संख्याबळ असतांनाही जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत अडचण होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे.गुरूवारी मुंबईत सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीला पालकमंत्री मधुकर पिचड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे, पांडुरंग अभंग, सरचिटणीस सोमनाथ धूत उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यात अधिकाधिक पंचायत समिती सत्ता आणि जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीबाबत चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी) काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने निवड होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे अद्याप अंतिम केलेली नाहीत. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेला सदस्य अथवा ओबीसी दाखला असणाऱ्या महिला सदस्याची या ठिकाणी निवड करता येणार आहे. यासह राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थ आणि बांधकाम ही महत्वाची समिती असून पहिले अडीच वर्ष उत्तरेकडे हे पद होते. यंदा दक्षिणेला संधी मिळावी, अशी मागणी होत आहे.