शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
3
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
4
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
5
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
6
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
7
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
8
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
9
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
10
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
11
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
12
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
13
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
14
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
15
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
16
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
17
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
18
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
19
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
20
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत

तंबाखू सेवनाने होते ११ वर्ष आयुष्य कमी

By admin | Updated: May 30, 2016 23:53 IST

भाऊसाहेब येवले ल्ल राहुरी जगभर तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ पासून ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला़ संघटनेच्या

कॅन्सरला आमंत्रण : महिनाभरात तंबाखू सुटणे शक्यभाऊसाहेब येवले ल्ल राहुरीजगभर तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ पासून ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला़ संघटनेच्या अहवालानुसार सन २०२० ते २०३० या कालावधीत जगातील १०० कोटी लोक तंबाखूपासून होणाऱ्या रोगामुळे मरतील़ याशिवाय तंबाखू सेवनाने मनुष्याचे आयुष्य तब्बल ९ ते ११ वर्षांनी कमी होईल. तंबाखूचा इतिहासही रोचक आहे. कोलंबसने तंबाखू जगभर पसरविण्याचे काम केले़ इंग्रजांबरोबर तंबाखूरुपी विषाचे भारतात आगमन झाले़ देशात ४ लाख हेक्टर क्षेत्रावर तंबाखूचे उत्पादन घेतले जाते़ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे १२० प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात़ तंबाखू सेवनानंतर १५ ते २० मिनिटांत निकोटीन हा विषारी घटक शरीरात पोहोचतो़ तंबाखूमध्ये निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड, टार, मार्श गॅस, अमोनिया, पायरिडीयन, कोलोडीन, कार्बोलिक अ‍ॅसिड, पॅराफिरोल आदी प्रकारचे विषारी घटक शरीरावर भयंकर दुष्परिणाम करतात़तंबाखू, बिडी, सिगारेट, तपकीर, गुटखा, मावा यांच्या सेवनाने आयुष्यमान ९ ते ११ वर्षांनी कमी होऊ शकते़ तंबाखूजन्य पदार्थांमुळे रक्ताच्या गुठळया तयार होतात़ हृदयाला रक्तपुरवठा करण्यास अडथळा होतो़ छातीत दुखणे, चक्कर येणे, मुंग्या येणे, अस्वस्थ वाटणे आदी लक्षणे दिसून येतात़ हृदयविकाराची शक्यता वाढते़ तंबाखूमुळे दृष्टिदोष, श्वसननलिकेला सूज येणे, दमा, खोकला वाढणे, कफ होणे, धाप लागणे या स्वरुपाचे विकार जडतात़अशी सोडा तंबाखू ...शंभर गॅ्रम ओवा व श्ांभर ग्रॅम बडीशोप तव्यावर तापवावी़ त्यावर एक लिंबू पिळावे़ हे मिश्रण तंबाखूची तलफ झाल्यानंतर खावे़पेरूचे पान घेऊन त्यामध्ये चमचाभर मध टाकून त्याचे दिवसातून तीन वेळा सेवन करावे़ओले खोबरे व कोथंबीर यांचे सेवन करावे़गूळ व कांदा एकत्र खावे़तंबाखू खावीशी वाटल्यास लिंबाचा पाला खावा़दररोज व्यायाम व चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे़तंबाखू खाणाऱ्या मित्रांपासून दूर राहावे़तंबाखूची आठवण झाल्यानंतर उलटे आकडे मोजावेत़आवडते छंद जोपासावे़मनावरील ताबा हा तंबाखू सोडण्याचा सर्वांत उत्तम मार्ग आहे़झोपताना व उठताना ३५ दिवस या सूचना पाळाव्यात.तंबाखू खाणाऱ्यांच्या तोंडात पांढरा, लालसर चट्टा आला असेल, तोंड उघडण्यास त्रास होत असेल किंवा तोंडात झालेली जखम भरत नसेल तर ही मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे असू शकतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जेवढ्या लवकर उपचार होतील, तेवढ्या लवकर कर्करोग आटोक्यात येऊ शकतो. जनजागृती कॅन्सरला आळा घालण्यात मोठी भूमिका बजावू शकते.- डॉ. सतीश सोनवणे, कॅन्सरतज्ज्ञ.