शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

थकीत पगाराचा प्रश्न निकाली

By admin | Updated: July 13, 2016 00:35 IST

नेवासा : तीन ते चार महिन्यांचा थकीत पगार त्वरित मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन

नेवासा : तीन ते चार महिन्यांचा थकीत पगार त्वरित मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन मंगळवारी प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर बारा दिवसात थकीत पगार एकरकमी केले जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर स्थगित करण्यात आले. नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी प्रशासक म्हणून पदभार घेणारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे हजर होते. धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे समर्पण फाऊंडेशनच्या मजदूर संघाचे प्रमुख डॉ. करणसिंह घुले यांनी आंदोलनामागील भूमिका विशद केली. तीन ते चार महिन्याचा पगार नसल्याने सफाई, पाणी पुरवठा, झाड़ू कामगारांवर कशी उपासमारीची वेळ आली, हे तहसीलदार व प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिले. माजी सरपंच नंदकुमार पाटील, सतीश गायके, ‘समर्पण’चे प्रवक्ते सुधीर चव्हाण यांनी चर्चेत भाग घेऊन यातून लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतली.प्रशासक म्हणून काम पाहताना आपण चांगली भूमिका बजावी. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वसुलीवर भर द्यावा, असे आवाहन प्रशासक म्हणून काम पाहणारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, राजेंद्र मापारी, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे उत्तमराव वाघमारे, प्रताप कडपे, राजेश्वर सोनवणे, राजेंद्र चव्हाण, बंडू चक्रनारायण, विश्वास वाघमारे तसेच कर्मचारी हजर होते. नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. (तालुका प्रतिनिधी)