शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

थकीत पगाराचा प्रश्न निकाली

By admin | Updated: July 13, 2016 00:35 IST

नेवासा : तीन ते चार महिन्यांचा थकीत पगार त्वरित मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन

नेवासा : तीन ते चार महिन्यांचा थकीत पगार त्वरित मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन मंगळवारी प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर बारा दिवसात थकीत पगार एकरकमी केले जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर स्थगित करण्यात आले. नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी प्रशासक म्हणून पदभार घेणारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे हजर होते. धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे समर्पण फाऊंडेशनच्या मजदूर संघाचे प्रमुख डॉ. करणसिंह घुले यांनी आंदोलनामागील भूमिका विशद केली. तीन ते चार महिन्याचा पगार नसल्याने सफाई, पाणी पुरवठा, झाड़ू कामगारांवर कशी उपासमारीची वेळ आली, हे तहसीलदार व प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिले. माजी सरपंच नंदकुमार पाटील, सतीश गायके, ‘समर्पण’चे प्रवक्ते सुधीर चव्हाण यांनी चर्चेत भाग घेऊन यातून लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतली.प्रशासक म्हणून काम पाहताना आपण चांगली भूमिका बजावी. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वसुलीवर भर द्यावा, असे आवाहन प्रशासक म्हणून काम पाहणारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल इंगळे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, राजेंद्र मापारी, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे उत्तमराव वाघमारे, प्रताप कडपे, राजेश्वर सोनवणे, राजेंद्र चव्हाण, बंडू चक्रनारायण, विश्वास वाघमारे तसेच कर्मचारी हजर होते. नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. (तालुका प्रतिनिधी)