शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Ahmednagar: पोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाने घेतले पेटवून, आमदार लहू कानडे यांनी केली पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By शिवाजी पवार | Updated: March 14, 2023 18:04 IST

Ahmednagar: पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच पेटवून घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाच्या घटनेचे पडसाद मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांवर छळ केल्याचा तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप केला आहे.

- शिवाजी पवार श्रीरामपूर : पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच पेटवून घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाच्या घटनेचे पडसाद मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांवर छळ केल्याचा तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांची याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली.

तालुक्यातील दत्तनगर येथे जाकीर बबन पठारे या तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. शनिवारी जालना जिल्ह्यातील पोलिस तपासासाठी आले असता अटकेच्या भीतीने पठारे याने एका दुकानामध्ये पेटवून घेतले होते. त्यानंतर पठारे याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले होते. मात्र जास्त भाजल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

तरुण पठारे याच्यावर जालना जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. लग्नाळू तरुणांना नवरी देण्याचे आमीष दाखवून फसवणूक झाल्याचा हा गुन्हा होता. या प्रकरणी तेथील पोलिस तपास करत असताना दत्तनगर येथे पठारे याच्या चौकशीकरिता आले होते.

दरम्यान, याप्रकरणी आमदार लहू कानडे यांनी मंगळवारी अधिवेशनात आवाज उठविला. मयत गरीब तरुणावर गुन्हा दाखल असला तरी त्याच्यावर अन्याय झाल्याची कुटुंबीयांची भावना आहे. पोलिसांच्या छळाला कंटाळून त्याने पेटवून घेतल्याचे तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार कानडे यांनी केली. या दोन्ही पोलिस अधिकार्यांना तातडीने तेथून बदलण्यात यावे, असेही कानडे यावेळी म्हणाले.आमदार कानडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर