शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ahmednagar: पोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाने घेतले पेटवून, आमदार लहू कानडे यांनी केली पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By शिवाजी पवार | Updated: March 14, 2023 18:04 IST

Ahmednagar: पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच पेटवून घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाच्या घटनेचे पडसाद मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांवर छळ केल्याचा तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप केला आहे.

- शिवाजी पवार श्रीरामपूर : पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच पेटवून घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाच्या घटनेचे पडसाद मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांवर छळ केल्याचा तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांची याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली.

तालुक्यातील दत्तनगर येथे जाकीर बबन पठारे या तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. शनिवारी जालना जिल्ह्यातील पोलिस तपासासाठी आले असता अटकेच्या भीतीने पठारे याने एका दुकानामध्ये पेटवून घेतले होते. त्यानंतर पठारे याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले होते. मात्र जास्त भाजल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

तरुण पठारे याच्यावर जालना जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. लग्नाळू तरुणांना नवरी देण्याचे आमीष दाखवून फसवणूक झाल्याचा हा गुन्हा होता. या प्रकरणी तेथील पोलिस तपास करत असताना दत्तनगर येथे पठारे याच्या चौकशीकरिता आले होते.

दरम्यान, याप्रकरणी आमदार लहू कानडे यांनी मंगळवारी अधिवेशनात आवाज उठविला. मयत गरीब तरुणावर गुन्हा दाखल असला तरी त्याच्यावर अन्याय झाल्याची कुटुंबीयांची भावना आहे. पोलिसांच्या छळाला कंटाळून त्याने पेटवून घेतल्याचे तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार कानडे यांनी केली. या दोन्ही पोलिस अधिकार्यांना तातडीने तेथून बदलण्यात यावे, असेही कानडे यावेळी म्हणाले.आमदार कानडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर