शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

‘तेल्या’मुळे डाळिंब बागांवर जेसीबी फिरविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब ...

केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब बागा नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झालेली आहे. बाजारी मागणी चांगली असल्याने दुष्काळी भागातील शेतकरी मोठा आर्थिक भार सोसत डाळिंब लागवडीकडे वळला. अरणगाव, खडकी, खंडाळा, वाळकी, पिंपळगाव लांडगा, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, पोखर्डी या भागात डाळिंब अधिक आहे. डाळिंब फळांना मिळणारा बाजारभाव आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक धाडस करीत डाळिंब पिकांची लागवड केली. यातून तालुक्यात डाळिंब बाग लागवड तीन हजार हेक्टरपर्यंत पोहोचली.

मात्र, सध्याच्या विपरीत हवामान व वातावरणाचा परिणाम या डाळिंब फळबागांवर होत आहे. यातून तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळांच्या उत्पादनावर थेट विपरीत परिणाम होत असल्याने तालुक्यातील जवळपास ८o टक्के डाळिंबांचे क्षेत्र जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वातावरणातील अतिआर्द्रता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. सततच्या रासायनिक खतांच्या डोसामुळे बागामधील उष्णतेचे प्रमाण वाढते. यामुळे बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिकच वाढला आहे. यातून काही अरणगाव, खडकी, खंडाळा यांसारख्या गावातील शेतकऱ्यांनी वेळीच या रोगावर उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे या भागातील काही डाळिंब फळबागा तग धरून आहेत.

----

काय आहेत तेल्याची लक्षणे..

डाळिंब बागांवर तेल्या रोगामुळे पानावर ठिपका पडतो. फळांवर हिरव्या रंगाचा डाग येतो. या रोगाचा हल्ला वाढत जाऊन फळे लवकर फुटतात. त्यातून तेलकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. यामुळे फळांचे उत्पादन कमालीचे घटते. फळे खराब निघतात.

-----

काय घ्यावी खबरदारी

डाळिंब पिकांवर रासायनिक खतांचा व औषधांचा वापर कमी करावा. जैविक खते, गांडूळ खते, शेण खत, शेंगदाणा खत यांचा वापर करावा. यामुळे वातावरणात आर्द्रता वाढते. तरी पिकांवरील उष्णतेचे प्रमाण कमी राहते. वातावरण पाहून रासायनिक खतांच्या मर्यादित स्वरूपात वापराचा निर्णय घ्यावा.

----

माझे पोखर्डीत डाळिबांची अडीच हजार झाडे होती. मात्र, तेल्या रोगामुळे ही सर्व झाडे काढून टाकली. आता अरणगावमध्ये चार हजार डाळिंबाची लागवड केली आहे. रासायनिक खते कमी करून जैविक खतांचा वापर सुरू केल्याने डाळिंब बाग तग धरून आहे.

- अक्षय कराळे,

डाळिंब उत्पादक, पोखर्डी

----

०१ डाळिंब, १