शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘तेल्या’मुळे डाळिंब बागांवर जेसीबी फिरविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब ...

केडगाव : नगर तालुक्यातील जवळपास तीन हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र तेल्या रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. त्यामुळे जेसीबी घालून डाळिंब बागा नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झालेली आहे. बाजारी मागणी चांगली असल्याने दुष्काळी भागातील शेतकरी मोठा आर्थिक भार सोसत डाळिंब लागवडीकडे वळला. अरणगाव, खडकी, खंडाळा, वाळकी, पिंपळगाव लांडगा, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, पोखर्डी या भागात डाळिंब अधिक आहे. डाळिंब फळांना मिळणारा बाजारभाव आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक धाडस करीत डाळिंब पिकांची लागवड केली. यातून तालुक्यात डाळिंब बाग लागवड तीन हजार हेक्टरपर्यंत पोहोचली.

मात्र, सध्याच्या विपरीत हवामान व वातावरणाचा परिणाम या डाळिंब फळबागांवर होत आहे. यातून तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळांच्या उत्पादनावर थेट विपरीत परिणाम होत असल्याने तालुक्यातील जवळपास ८o टक्के डाळिंबांचे क्षेत्र जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

वातावरणातील अतिआर्द्रता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. सततच्या रासायनिक खतांच्या डोसामुळे बागामधील उष्णतेचे प्रमाण वाढते. यामुळे बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिकच वाढला आहे. यातून काही अरणगाव, खडकी, खंडाळा यांसारख्या गावातील शेतकऱ्यांनी वेळीच या रोगावर उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे या भागातील काही डाळिंब फळबागा तग धरून आहेत.

----

काय आहेत तेल्याची लक्षणे..

डाळिंब बागांवर तेल्या रोगामुळे पानावर ठिपका पडतो. फळांवर हिरव्या रंगाचा डाग येतो. या रोगाचा हल्ला वाढत जाऊन फळे लवकर फुटतात. त्यातून तेलकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. यामुळे फळांचे उत्पादन कमालीचे घटते. फळे खराब निघतात.

-----

काय घ्यावी खबरदारी

डाळिंब पिकांवर रासायनिक खतांचा व औषधांचा वापर कमी करावा. जैविक खते, गांडूळ खते, शेण खत, शेंगदाणा खत यांचा वापर करावा. यामुळे वातावरणात आर्द्रता वाढते. तरी पिकांवरील उष्णतेचे प्रमाण कमी राहते. वातावरण पाहून रासायनिक खतांच्या मर्यादित स्वरूपात वापराचा निर्णय घ्यावा.

----

माझे पोखर्डीत डाळिबांची अडीच हजार झाडे होती. मात्र, तेल्या रोगामुळे ही सर्व झाडे काढून टाकली. आता अरणगावमध्ये चार हजार डाळिंबाची लागवड केली आहे. रासायनिक खते कमी करून जैविक खतांचा वापर सुरू केल्याने डाळिंब बाग तग धरून आहे.

- अक्षय कराळे,

डाळिंब उत्पादक, पोखर्डी

----

०१ डाळिंब, १