शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

राज्यातील अनुदानित वसतिगृहांमधील अर्धा लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 20:38 IST

जवळपास वर्षभरापासून राज्यातील सुमारे आठशे अनुदानित वसतिगृहांना राज्य सरकारने एका रूपयाचेही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रातील सुमारे अर्धा लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : जवळपास वर्षभरापासून राज्यातील सुमारे आठशे अनुदानित वसतिगृहांना राज्य सरकारने एका रूपयाचेही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रातील सुमारे अर्धा लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारी अनुदान रोखून धरल्यामुळे संस्थाचालक वर्षभरापासून उधारी-उसनवारीवर आपली अनुदानित वसतिगृहे चालवित आहेत. उधारी-उसनवारी प्रचंड प्रमाणात थकली आहे. त्यामुळे या देणेक-यांचा पैशांसाठी वसतिगृह अधीक्षकांकडे तगादा वाढला आहे. सरकारी अनुदानाचे पैसे सरकार देत नसल्याने देणेक-यांची देणी भागवायची कशी?, त्यांचे पैसे द्यायचे कसे? या विवंचनेत या वसतिगृहांचे अधीक्षक आहेत.महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत २३८८ अनुदानित वसतिगृहे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालविली जातात. त्यातून १ लाख मुलामुलींच्या मोफत भोजन निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून प्रति विद्यार्थी दरमहा ९०० रूपये अनुदान दिले जाते. आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रूपयांमध्ये एक दिवस नाश्ता, दुपार व संध्याकाळचे पोटभर सकस जेवण देणे सरकारला अपेक्षित आहे. वसतिगृहांना वर्षात दोन टप्प्यात अनुदान दिले जाते. जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यांचे आगाऊ अनुदान (अ‍ॅडव्हान्स ग्रँट) दिवाळीच्या सुमारास नोव्हेंबरमध्ये दिले जाते. तर उर्वरित डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या पाच महिन्यांचे अंतिम अनुदान मे महिन्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जाते. पण वर्षभरापासून हे अनुदानच राज्यातील अनेक वसतिगृहांना मिळालेले नाही.

अनुदान का मिळत नाही?

सोलापूर जिल्ह्यात काही अनुदानित वसतिगृहांकडे मूळ मान्यतेचे आदेश नसल्याचे आढळल्यानंतर सामाजिक न्याय विभागाने राज्यभरातच अशा वसतिगृहांची तपासणी मोहीम हाती घेतली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील जिल्हा समाजकल्याण अधिकाºयांना त्यांच्या अधिनस्त अनुदानित वसतिगृहांची तपासणी करुन, ज्या अनुदानित वसतिगृहांकडे मूळ मान्यता दिलेल्या आदेशाची प्रत नाही, त्यांचे अनुदान थांबविण्याचे आदेश २१ सप्टेंबर २०१५ ला समाजकल्याण आयुक्तांनी दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील ८८ वसतिगृहांची सुनावणी होऊन ९ वसतिगृहांना अनुदान देण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ७९ वसतिगृहांचे अनुदान राहिले आहे. अनुदान उपलब्ध आहे. लवकरच आदेश मिळताच ते वाटप होईल.-नितीन उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, अहमदनगर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर