शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नशिबी घाणीत उपोषणाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST

देवळाली प्रवरा : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामागील घाणीच्या साम्राज्यात आमरण उपोषण ...

देवळाली प्रवरा : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामागील घाणीच्या साम्राज्यात आमरण उपोषण करण्याची वेळ आली. विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त कृती समितीला अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने घाणीच्या साम्राज्यात आमरण उपोषण करण्यासाठी जागा दिली आहे. त्यामुळे विद्यापीठ उभारणीसाठी जमिनी देऊनही शेतकऱ्यांच्या नशिबी घाणीत उपोषण करण्याची वेळ आली. त्यामुळे प्रशासनाच्या विरोेधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

घाणीच्या साम्राज्यात उभे करून, आम्ही कधीही न केलेल्या चुकीची शिक्षा आम्हाला देऊ नका. सन्मानाने आमचे हक्क मागण्याचा अधिकार आमच्यापासून हिरावून घेऊ नका, अशी हाक प्रकल्पग्रस्त देत आहेत. शासन निर्णयातील तरतुदीनुसार नोकरीत सामावून घेता येत नसेल, तर आमच्या जमिनी आम्हाला परत करा, म्हणजे आमच्या उदरनिर्वाहाची सोय होईल, असे शेतकरी सांगत आहेत. राहुरी तालुक्यातील सहा गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेत प्रशासनाने सामावून घेण्यासाठी हा लढा सुरू केला आहे. १९६८ साली विद्यापीठ स्थापन झाले. त्यावेळी ५८४ शेतकऱ्यांच्या २८४९.८८ हेक्टर जमिनीचे संपादन झाले. कुटुंबातील व्यक्तीला विद्यापीठ सेवेत घेण्याबाबत शासन तरतूद असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलले जात आहे. १ जून, २०२१ पर्यंत मंजूर पदापैकी गट क व गट ड संवर्गातील १,३१४ पदे रिक्त आहेत. २००८ पर्यंत व २००९ मध्ये विद्यापीठाने ३९४ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना विद्यापीठ सेवेत सामावून घेतले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्त यांना विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

.................

सहा गावांतील प्रकल्पग्रस्त

राहुरी तालुक्यातील खडांबे, सडे, वरवंडी, राहुरी खुर्द, पिंप्री अवघड, डिग्रस या सहा गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पग्रस्तांमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांमध्ये आंदोलनाबाबत भावना तीव्र होत आहे. ३० ऑगस्टपासून अमरण उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पातील बाधित व्यक्तीला त्याच प्रकल्पात गट क व गट डमध्ये सामावून घेताना ५० टक्के जागेवर सामावून घेण्याचे स्पष्ट तरतूद असतानाही विद्यापीठाने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना दर वेळी डावलले आहे. विद्यापीठात ४५ टक्क्यांपर्यंत रिक्त जागा आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेत सामावून घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष विजय शेडगे, राहुल शेटे, श्रीकांत बाचकर, सम्राट लांडगे सहभागी झाले आहेत.

०१ राहुरी