शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शताद्बी वर्षातही टिळकांचे स्मृतिस्थळ दुर्लक्षित

By साहेबराव नरसाळे | Updated: May 9, 2019 12:03 IST

पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़

साहेबराव नरसाळेअहमदनगर : पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़ महाराष्ट्रात एकमेव असलेल्या या स्मृतिस्थळाचा विकास व्हावा, अशी मागणी अभ्यासकांमधून होत आहे़रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे ६ डिसेंबर १८६१ रोजी चित्पावन ब्राम्हण कुटुंबात नारायण टिळक यांचा जन्म झाला़ पुढे त्यांनी तुकाराम नत्थुजी धेंडे यांच्या हातून १० फेब्रुवारी १८९५ रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारला़ टिळक १८८६ साली नगरला आले आणि पुढे २५ वर्षे नगरमध्येच वास्तव्यास होते़ नगरमध्ये जुन्या वसंत टॉकीजजवळ फर्ग्युसन गेट या ठिकाणी राहत होते़ याच काळात नगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती धर्माच्या विख्यात मासिकाचे ते ७ वर्षे संपादक होते. ३१ आॅगस्ट १९०४ रोजी राहुरीत ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून दीक्षाही घेतली आणि रेव्हरंड ही उपाधी त्यांना मिळाली़ राहुरी येथे त्यांनी गरीब व गरजू लोकांसाठी ‘ख्रिस्त सदन’ची उभारणी केली़ रेव्हरंड टिळक यांच्यासोबत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हेही नगरमध्ये वास्तव्यास होते़ रेव्हरंड टिळक व लक्ष्मीबाई यांनी बालकवींचा सांभाळ केल्याचे सांगितले जाते़ ख्रिस्ती धर्मातील ‘उपासना संगीत’ या पुस्तकातील अनेक गीते टिळकांनी नगरमध्येच लिहिली़ मराठी ख्रिस्ती साहित्यात त्यांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहिले़ यातील काही भाग त्यांनी नगरमध्ये व काही साताºयामध्ये लिहिला आहे़ ९ मे १९१९ साली टिळकांचे मुंबई येथे निधन झाले़ त्यांच्या मृत्युपत्रात नगरमध्ये अस्थींचे दफन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती़ त्यानुसार नगरमध्ये अस्थींचे दफन करण्यात आले व तेथे त्यांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले़ या स्मृतिस्थळाभोवती पूर्वी लोखंडी कंपाउंड होते़ मात्र, त्याचे लोखंड काही लोकांनी चोरुन नेले होते़ त्यामुळे स्मृती शताब्दी वर्षानिमित्त फेबु्रवारी २०१९ मध्ये या स्मृतीस्थळाची रंगरंगोटी करण्यात आली़ टिळकांच्या साहित्याचे अभ्यासक वर्षभर त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात़ टिळकांच्या साहित्यावर अनेकांनी डॉक्टरेट मिळविलेली आहे़ लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रा’त नगरचा उल्लेख आहे़ ते वाचल्यानंतर अनेक अभ्यासक नगरला येतात़ स्मृतिस्थळास भेट देतात़ त्यामुळे या स्मृतिस्थळाचा विकास होणे आवश्यक आहे, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे़स्मृती शताद्बी वर्षानिमित्त टिळकांचे दुर्लक्षित असलेले स्मृतिस्थळ विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे़ त्यासंदर्भात लवकरच नियोजन करुन पुढील दिशा ठरविण्यात येईल़ -संजय आढाव, टिळकांच्या साहित्याचे अभ्यासक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय