शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

तिढा सुटला.. २० मे पासून मिळणार कुकडीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात जुन्नरच्या प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली. त्यामुळे ...

श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात जुन्नरच्या प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून येडगाव धरणातून २० मे पासून डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात येणार आहे.

९ मे पासून कुकडीचे आवर्तन सोडण्यात येणार होते. त्यावर आठमाही पाण्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ७ मे रोजी कुकडीचे आवर्तन सोडण्यावर स्थगिती दिली होती. पुढील सुनावणी १२ मे रोजी ठेवण्यात आली होती.

दरम्यान, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के, अनुराधा नागवडे, विलास काकडे यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या. ११ मे रोजी आमदार बबनराव पाचपुते, रोहित पवार, अतुल बेनके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. प्रशांत औटी यांना याचिका मागे घेण्यास सांगावे अशी मागणी केली. त्यावेळी जयंत पाटील यांनी औटी यांच्याशी चर्चा केली होती. ते याचिका मागे घेणार असेच चित्र होते. परंतु, प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली नाही. त्यामुळे सरकारी पक्षाला न्यायालयाकडे बाजू मांडण्यासाठी वेळ मागावा लागला. न्यायालयाने १७ मे रोजी पुन्हा सुनावणी ठेवली.

त्यानंतर आमदार रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पुन्हा भेट घेतली. त्यानंतर प्रशांत औटी यांची पुन्हा मनधरणी केली. अखेर प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २० मे रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

---

आवर्तनात कायमच राजकारण..

कुकडीचे आवर्तन वेळेवर सुटावे, अशी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा येथील शेतकऱ्यांची भावना असते. परंतु, स्वत:च्या राजकारणासाठी राजकीय नेते डाव, प्रति डाव टाकतात. यात श्रीगोंद्याचे नेते आघाडीवर असतात. नेत्यांच्या भूमिकेमुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा फायद्यापेक्षा तोटाच जास्त होत असल्याचे दिसते.

----

प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली ही चांगली बाब आहे. मात्र कुकडीच्या पाण्यासाठी लढाई या पुढील काळातही सुरू ठेवावी लागणार आहे. आम्हाला कुणाच्या ताटातील भाकरी नको. मात्र डिंभे, माणिकडोह जोड बोगद्याचे काम करून आम्हाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे.

-मारुती भापकर,

सामाजिक कार्यकर्ते