शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

तिढा सुटला.. २० मे पासून मिळणार कुकडीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात जुन्नरच्या प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली. त्यामुळे ...

श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात जुन्नरच्या प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून येडगाव धरणातून २० मे पासून डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात येणार आहे.

९ मे पासून कुकडीचे आवर्तन सोडण्यात येणार होते. त्यावर आठमाही पाण्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ७ मे रोजी कुकडीचे आवर्तन सोडण्यावर स्थगिती दिली होती. पुढील सुनावणी १२ मे रोजी ठेवण्यात आली होती.

दरम्यान, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के, अनुराधा नागवडे, विलास काकडे यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या. ११ मे रोजी आमदार बबनराव पाचपुते, रोहित पवार, अतुल बेनके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. प्रशांत औटी यांना याचिका मागे घेण्यास सांगावे अशी मागणी केली. त्यावेळी जयंत पाटील यांनी औटी यांच्याशी चर्चा केली होती. ते याचिका मागे घेणार असेच चित्र होते. परंतु, प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली नाही. त्यामुळे सरकारी पक्षाला न्यायालयाकडे बाजू मांडण्यासाठी वेळ मागावा लागला. न्यायालयाने १७ मे रोजी पुन्हा सुनावणी ठेवली.

त्यानंतर आमदार रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पुन्हा भेट घेतली. त्यानंतर प्रशांत औटी यांची पुन्हा मनधरणी केली. अखेर प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २० मे रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

---

आवर्तनात कायमच राजकारण..

कुकडीचे आवर्तन वेळेवर सुटावे, अशी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा येथील शेतकऱ्यांची भावना असते. परंतु, स्वत:च्या राजकारणासाठी राजकीय नेते डाव, प्रति डाव टाकतात. यात श्रीगोंद्याचे नेते आघाडीवर असतात. नेत्यांच्या भूमिकेमुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा फायद्यापेक्षा तोटाच जास्त होत असल्याचे दिसते.

----

प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली ही चांगली बाब आहे. मात्र कुकडीच्या पाण्यासाठी लढाई या पुढील काळातही सुरू ठेवावी लागणार आहे. आम्हाला कुणाच्या ताटातील भाकरी नको. मात्र डिंभे, माणिकडोह जोड बोगद्याचे काम करून आम्हाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे.

-मारुती भापकर,

सामाजिक कार्यकर्ते