शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेला पितृपक्ष आडवा

By admin | Updated: November 6, 2023 13:04 IST

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते.

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर पितृपक्षातच अर्ज दाखल करावे लागतील, अशी धास्तीच इच्छुकांनी घेतली आहे. घटस्थापना झाल्यानंतरच्या काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लागणार, लागणार ती आचारसंहिता अद्यापही लागली नसल्याने राजकीय नेते-कार्यकर्त्यांची ‘काक’दृष्टी आता निवडणूक कार्यक्रमाकडे लागली आहे.श्री. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वांनाच हुलकावणी दिली. होणार होणार म्हणून होणारी आयोगाची पत्रकार परिषद झालीच नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला. ९ सप्टेंबरला आचारसंहिता लागली असती तर कदाचित अर्ज विकत घेण्याची प्रक्रिया पितृपक्षातच सुरू झाली असती, अशी धास्ती अनेकांना होती. भारतीय संस्कृतीमधील पितृपक्षाला असलेले महत्त्व आणि या काळात टाळली जाणारी शुभ कामे यामुळे आचारसंहिता जाहीर करण्याचा मुहूर्तही पुढे ढकलला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज-उद्या आचारसंहिता जाहीर झाली तरी निवडणूक प्रक्रिया ही घटस्थापनेनंतर सुरू होईल, अशीच दुसरी शक्यताही व्यक्त होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगितल्याने कोणते ती दोन राज्ये अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सध्याची पूरपरिस्थिती पाहता तेथे निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत एक-दोन दिवसात आचारसंहिता लागेल, या आशेवरच सर्वजण आहेत. आपल्या पितरांची आठवण व्हावी, अशी भावना पितृपक्षामध्ये असते. याबाबत अनेक मतभेद आहेत. पितरांच्या नावाने पिंडदान, श्राद्ध घातले जात असल्याने शुभकार्य टाळण्याकडेच अनेकांचा कल आहे. (प्रतिनिधी)