शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

आचारसंहितेला पितृपक्ष आडवा

By admin | Updated: November 6, 2023 13:04 IST

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते.

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर पितृपक्षातच अर्ज दाखल करावे लागतील, अशी धास्तीच इच्छुकांनी घेतली आहे. घटस्थापना झाल्यानंतरच्या काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लागणार, लागणार ती आचारसंहिता अद्यापही लागली नसल्याने राजकीय नेते-कार्यकर्त्यांची ‘काक’दृष्टी आता निवडणूक कार्यक्रमाकडे लागली आहे.श्री. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वांनाच हुलकावणी दिली. होणार होणार म्हणून होणारी आयोगाची पत्रकार परिषद झालीच नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला. ९ सप्टेंबरला आचारसंहिता लागली असती तर कदाचित अर्ज विकत घेण्याची प्रक्रिया पितृपक्षातच सुरू झाली असती, अशी धास्ती अनेकांना होती. भारतीय संस्कृतीमधील पितृपक्षाला असलेले महत्त्व आणि या काळात टाळली जाणारी शुभ कामे यामुळे आचारसंहिता जाहीर करण्याचा मुहूर्तही पुढे ढकलला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज-उद्या आचारसंहिता जाहीर झाली तरी निवडणूक प्रक्रिया ही घटस्थापनेनंतर सुरू होईल, अशीच दुसरी शक्यताही व्यक्त होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगितल्याने कोणते ती दोन राज्ये अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सध्याची पूरपरिस्थिती पाहता तेथे निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत एक-दोन दिवसात आचारसंहिता लागेल, या आशेवरच सर्वजण आहेत. आपल्या पितरांची आठवण व्हावी, अशी भावना पितृपक्षामध्ये असते. याबाबत अनेक मतभेद आहेत. पितरांच्या नावाने पिंडदान, श्राद्ध घातले जात असल्याने शुभकार्य टाळण्याकडेच अनेकांचा कल आहे. (प्रतिनिधी)