शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

आचारसंहितेला पितृपक्ष आडवा

By admin | Updated: November 6, 2023 13:04 IST

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते.

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर पितृपक्षातच अर्ज दाखल करावे लागतील, अशी धास्तीच इच्छुकांनी घेतली आहे. घटस्थापना झाल्यानंतरच्या काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लागणार, लागणार ती आचारसंहिता अद्यापही लागली नसल्याने राजकीय नेते-कार्यकर्त्यांची ‘काक’दृष्टी आता निवडणूक कार्यक्रमाकडे लागली आहे.श्री. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वांनाच हुलकावणी दिली. होणार होणार म्हणून होणारी आयोगाची पत्रकार परिषद झालीच नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला. ९ सप्टेंबरला आचारसंहिता लागली असती तर कदाचित अर्ज विकत घेण्याची प्रक्रिया पितृपक्षातच सुरू झाली असती, अशी धास्ती अनेकांना होती. भारतीय संस्कृतीमधील पितृपक्षाला असलेले महत्त्व आणि या काळात टाळली जाणारी शुभ कामे यामुळे आचारसंहिता जाहीर करण्याचा मुहूर्तही पुढे ढकलला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज-उद्या आचारसंहिता जाहीर झाली तरी निवडणूक प्रक्रिया ही घटस्थापनेनंतर सुरू होईल, अशीच दुसरी शक्यताही व्यक्त होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगितल्याने कोणते ती दोन राज्ये अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सध्याची पूरपरिस्थिती पाहता तेथे निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत एक-दोन दिवसात आचारसंहिता लागेल, या आशेवरच सर्वजण आहेत. आपल्या पितरांची आठवण व्हावी, अशी भावना पितृपक्षामध्ये असते. याबाबत अनेक मतभेद आहेत. पितरांच्या नावाने पिंडदान, श्राद्ध घातले जात असल्याने शुभकार्य टाळण्याकडेच अनेकांचा कल आहे. (प्रतिनिधी)