शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

निळवंडेतून मिळणार शेतीसाठी तीन आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:22 IST

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी तीन तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.

राजूर : भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी तीन तर पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तनांचे नियोजन मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले.भंडारदरा-निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर या धरणांमध्ये शिल्लक असणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार सुधीर तांबे, जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख आदी उपस्थित होते.या दोन्ही धरणांमध्ये शिल्लक असणाºया पाण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. यात शेतीसाठी रब्बीचे नुकतेच एक आवर्तन सोडण्यात आले होते. यानंतर रब्बीसाठी दुसरे आवर्तन २० जानेवारी ते १५फेब्रुवारीच्या दरम्यान असणार आहे.तर उन्हाळ्यात शेतीसाठी २० मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत असे एकूण शेतीसाठी तीन आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी एकूण चार आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले