शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

श्रीगोंद्यात तिच तीन घराणी ! झेंडे मात्र बदलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:58 IST

विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे.

ठळक मुद्देभाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुतेराष्ट्रवादीकडून आमदार राहुल जगतापअनुराधा नागवडेही उतरणार रिंगणात

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मतलबी वारे जोराने वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय पक्षांच्या उमेदवारींची समीकरणे बदलणार का? यावर चर्चा झडत आहेत.भाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. २०१४ मध्ये पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला होता. श्रीगोंद्यातील काही विखे समर्थकांनी आमदार राहुल जगताप यांना भाजपात आणण्यासाठी विखे, पिचड आणि दानवे यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली आहे.नुकतेच अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य साखर संघावर राजेंद्र नागवडे आणि घनश्याम शेलार यांना संधी देऊन राष्ट्रवादी उमेदवारासाठी तटबंदी मजबूत करण्यासाठी व्यूहरचना आखली. मात्र त्याचा फायदा निवडणुकीत कितपत होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये घेतलेल्या मुलाखतीला आमदार राहुल जगताप उशिरा गेले. त्याचवेळी त्यांच्या पक्षांतराबाबत शंकेची पाल चुकचुकली. त्याचवेळी राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनीही राष्ट्रवादीचा इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पाचपुतेंना भाजपाची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि मंत्री पदासाठी काटाकाटीच्या राजकारणात काहीही घडू शकते.भाजपाने आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी दिली तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना पुन्हा एकदा वेगळे चिन्ह घेऊन निवडणुकीस सामोरे जावे लागेल. आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे श्रीगोंद्याच्या आखाड्यात पाचपुते, जगताप आणि नागवडे या दिग्गज घराण्यात लढाई रंगणार आहे.कमळ आणि अपयशश्रीगोंदा विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत यापूर्वी माजी खासदार दिलीप गांधी, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने भाजपाला मताधिक्य दिले. पण एकाही विधानसभा निवडणुकीत भाजपाला श्रीगोंदेकरांनी स्वीकारले नाही. राजेंद्र नागवडे, बबनराव पाचपुते यांना भाजपाकडून उमेदवारी केली पण त्यांनाही जनतेने नाकारले. आता कमळ कुणाच्या पदरात पडते यावर उत्सुकता राहणार आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण