शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

श्रीगोंद्यात तिच तीन घराणी ! झेंडे मात्र बदलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:58 IST

विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे.

ठळक मुद्देभाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुतेराष्ट्रवादीकडून आमदार राहुल जगतापअनुराधा नागवडेही उतरणार रिंगणात

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : विधानसभेची निवडणूक जवळ येताच श्रीगोंदा मतदार संघातील राजकीय किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मतलबी वारे जोराने वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय पक्षांच्या उमेदवारींची समीकरणे बदलणार का? यावर चर्चा झडत आहेत.भाजपाकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. २०१४ मध्ये पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला होता. श्रीगोंद्यातील काही विखे समर्थकांनी आमदार राहुल जगताप यांना भाजपात आणण्यासाठी विखे, पिचड आणि दानवे यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली आहे.नुकतेच अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य साखर संघावर राजेंद्र नागवडे आणि घनश्याम शेलार यांना संधी देऊन राष्ट्रवादी उमेदवारासाठी तटबंदी मजबूत करण्यासाठी व्यूहरचना आखली. मात्र त्याचा फायदा निवडणुकीत कितपत होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये घेतलेल्या मुलाखतीला आमदार राहुल जगताप उशिरा गेले. त्याचवेळी त्यांच्या पक्षांतराबाबत शंकेची पाल चुकचुकली. त्याचवेळी राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनीही राष्ट्रवादीचा इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पाचपुतेंना भाजपाची उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि मंत्री पदासाठी काटाकाटीच्या राजकारणात काहीही घडू शकते.भाजपाने आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी दिली तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना पुन्हा एकदा वेगळे चिन्ह घेऊन निवडणुकीस सामोरे जावे लागेल. आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे श्रीगोंद्याच्या आखाड्यात पाचपुते, जगताप आणि नागवडे या दिग्गज घराण्यात लढाई रंगणार आहे.कमळ आणि अपयशश्रीगोंदा विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत यापूर्वी माजी खासदार दिलीप गांधी, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने भाजपाला मताधिक्य दिले. पण एकाही विधानसभा निवडणुकीत भाजपाला श्रीगोंदेकरांनी स्वीकारले नाही. राजेंद्र नागवडे, बबनराव पाचपुते यांना भाजपाकडून उमेदवारी केली पण त्यांनाही जनतेने नाकारले. आता कमळ कुणाच्या पदरात पडते यावर उत्सुकता राहणार आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण