शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हारमध्ये आढळली बिबट्यांची तीन बछडे; वनखात्याने लावला पिंजरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 16:32 IST

कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे.

कोल्हार : कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. सध्या कोल्हार भगवतीपूरसह परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार आणि धुमाकूळ सुरूच आहे. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गळनिंब व कुरणपूर येथे दोन चिमुरड्या गंभीर जखमी झाल्यानंतर आता वनखात्याचे अधिकारी जागे झाले आहेत. कोल्हार येथील तीन चारी परिसरात नितीन देवकर यांच्या गट नंबर ३७२ मध्ये डाळिंबाच्या बागेत रविवारी सकाळी तीन बछडे आढळून आले. त्यांनी तातडीने वनखात्यास याची माहिती दिली. सध्या इथेच गळनिंब परिसरात ठाण मांडून बसलेल्या अधिका-यांनी तातडीने धाव घेत बछड्यांना ताब्यात घेतले आहे.पिंज-याच्या ठिकाणी जाण्यास मनाईबिबट्याच्या मादीला या ठिकाणचे पिल्ले दिसली नाहीत तर पिल्लांच्या विरहाने मादी धुमाकूळ घालू शकते. या पार्श्वभूमीवर तिन्ही बछड्यांना पिंजरा लावून त्यामध्ये ठेवण्यात आले आहेत. बछड्यामुळे बिबट्या मादीही जेरबंद होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पिंज-याजवळ कोणीही जाण्यास धजावत नाही. कुठल्याही क्षणी बिबट्याची मादी पिल्लांच्या शोधत आल्यास मानवावर हल्ला करू शकतो. यासाठी सदर परिसरात सर्वांना जाण्यास बंदी केली आहे. बिबट्या नर अथवा मादी पिंज-यात अडकल्यास एका मागोमाग पाचवा बिबट्या जेरबंद होऊन परिसरातील बिबट्याची दहशत कमी होऊ शकते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताleopardबिबट्याforest departmentवनविभाग