शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधानसभेसाठी १८ हजार मतदान यंत्रे शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:59 IST

राज्यात आॅक्टोबरमध्ये विधासभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी तामिळनाडू राज्यातून १८ हजार मतदान यंत्रे नगरमध्ये दाखल झाली आहेत.

अहमदनगर : राज्यात आॅक्टोबरमध्ये विधासभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी तामिळनाडू राज्यातून १८ हजार मतदान यंत्रे नगरमध्ये दाखल झाली आहेत. ही सर्व यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात उतरविण्यात आली आहेत.आॅक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून मतदान यंत्रांची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेली मतदानयंत्रे नगरमध्येच असली तरी ती यंत्रे विधानसभेला वापरली जाणार नाहीत. त्यामुळे विधानसभेसाठी तामिळनाडू राज्यातील मतदानयंत्रे मागवण्यात आली आहेत. विधानसभेसाठी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे ७ हजार बॅलेट युनिट, ५ हजार २३० कंट्रोल युनिट, तर ५ हजार ४५० व्हीव्हीपॅट आदी सुमारे १८ हजार यंत्रे लागणार आहेत. ही यंत्रे तामिळनाडू राज्यातील वेल्लोर जिल्ह्यातून घेऊन येण्याचे आदेश केंद्रीय आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी उदय किसवे, पुनर्वसन विभागाचे तहसीलदार महेश शेलार या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांची दोन पथके ही यंत्रे आणण्यासाठी गेली होती.हे अधिकारी रविवारी (दि. ११) ही सर्व यंत्रे घेऊन पोलीस बंदोबस्तात नगरला दाखल झाले. आता ही यंत्रे एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली गेली आहेत.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली. लवकरच या मतदानयंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी केली जाणार आहे.जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मतदान केंद्र आहेत. त्याच्या दुप्पट मतदान यंत्र प्रशासनाने मागवले आहेत. एका बॅलेट युनिटवर नोटा व १५ उमेदवारांची नावे समाविष्ट होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिले तर एका केंद्रावर दोन बॅलेट युनिट लावावे लागतात. त्यामुळेच प्रशासनाने ही जादा यंत्रे मागवली आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय