शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

शेतकऱ्यांच्या डोक्यावर तीन हजार कोटी कर्जाचा डोंगर

By admin | Updated: May 10, 2017 13:40 IST

बळीराजाला शेतातील उत्पादकता वाढविण्यास मदत व्हावी, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकाकडून जिल्ह्यात मार्चअखेर ३३६५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले.

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ १० - बळीराजाला शेतातील उत्पादकता वाढविण्यास मदत व्हावी, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकाकडून जिल्ह्यात मार्चअखेर ३३६५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. परंतु दुष्काळी स्थिती, शेतमालाचे घसरलेले दर यामुळे कर्जफेड करायची कशी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुके दुष्काळी आहेत. त्यामुळे पाण्याअभावी येथील शेती कायमच तोट्यात असते. शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून शासन विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून खरीप व रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. नगर जिल्ह्यातही विविध बँकांमार्फत तब्बल ३३६५ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांच्या जमिनीवर देण्यात आले आहे. वर्षानुवर्षांचा दुष्काळ, तसेच यावर्षी शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यात मोठ्या अडचणी आल्या. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. यंदाही कर्जमाफीची टूम उठली, काही दिवस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट होताच पुन्हा चेहरे पडले. त्यामुळे आता शासनाने एक तर कर्जमाफी द्यावी, नाहीतर शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मार्च २०१७ अखेरचे पीककर्ज वाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - १७१७ कोटी एकूण राष्ट्रीयकृत बँका- १६३९ कोटी ग्रामीण बँका - ८.६५ कोटी दुहेरी फटकाशेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या नगर येथील जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक स्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. नगरच्या शेजारील जिल्ह्यांतील बँका एकीकडे अडचणीत येत असताना नगर जिल्हा बँक मात्र मजबूत राहिली. त्यामुळे बँकेकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले जाते. परंतु यंदा कर्जमाफीच्या आशेने नगर जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीतही मोठी घट झाली. कर्जमाफी होणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जफेड केली नाही, परिणामी त्यांना व्याजातील सवलत मिळाली नाही. आता कर्ज थकीत असल्याने व्याजाचा भुर्दंड भरावा लागेल, शिवाय नवीन कर्जही मिळणार नाही. कर्जमाफीच्या अफवेने असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला.