शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

नगर जिल्ह्यातील २४ हजार बालके कमी वजनाची; राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:17 IST

जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांना कुपोषणाच्या धोक्यातून बाहेर काढण्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. कमी वजनाच्या बालकांची संख्या घटून २४ हजारांवर आली आहे. तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्याही घटून ३ हजार ८७४ वर आली आहे़. 

अहमदनगर : जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांना कुपोषणाच्या धोक्यातून बाहेर काढण्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. कमी वजनाच्या बालकांची संख्या घटून २४ हजारांवर आली आहे. तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्याही घटून ३ हजार ८७४ वर आली आहे़. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे जिल्ह्यात एकात्मिक बालविकासचे २१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांद्वारे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. जानेवारीमध्ये ३ लाख २३ हजार बालकांचा सर्व्हे करण्यात आला. बालकांचे वजन, उंची, दंडघेर घेत बालकांचे आरोग्य तपासण्यात आले. दर महिन्याला कुपोषणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात आहे. डिसेंबर २०१९ मध्ये सुमारे ३० हजारपेक्षा जास्त बालके कुपोषित असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली होती़. सर्वेक्षणात ही आकडेवारी २४ हजार ९०० वर आली आहे. तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या डिसेंबरमध्ये ४ हजार ८० वरून ३ हजार ८७४ झाली आहे. राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषणअकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यातील कुपोषणाची टक्केवारी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. अकोले व राजूर असे दोन प्रकल्प अकोले तालुक्यात आहेत. त्यात राजूर प्रकल्पांतर्गत सर्वाधिक ५़८० टक्के बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्याखालोखाल अकोले प्रकल्पात २़८६ टक्के बालके कुपोषित असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. वय, उंची वाढते; मात्र वजन घटतेबालकांची आरोग्य तपासणी करताना वयानुसार वजन आणि उंचीनुसार वजन घेतले जाते. वयानुसार वजन कमी असलेल्या बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर उंचीनुसार वजन कमी असलेल्या बालकांची संख्या तुलनेने नगण्य असल्याचे आढळून आले आहे. उंचीनुसार मध्यम कमी वजनाची २ हजार ७२६ तर तीव्र कमी वजनाची ५३४ बालके आढळून आली आहेत. वय, उंची वाढूनही वजन न वाढल्यामुळे ही बालके कुपोषित गृहित धरली जातात. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमार्फत योग्य पोषण आहार पुरवून या बालकांना सुदृढ करण्यावर प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchildren's dayबालदिन