शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST

पारनेर : समाजाचे चांगले करणे हेच आमदार लंके यांचेे काम आहे. चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त, ...

पारनेर : समाजाचे चांगले करणे हेच आमदार लंके यांचेे काम आहे. चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त, तितका माणूस मोठा. तुकोबारायांना सर्वांनी त्रास दिला, ते जगद्गुरू बनले. ज्ञानेश्वर ज्ञानीयांचा राजा बनले. शिवाजी महाराज छत्रपती बनले, असे सांगत, टीकाकारांकडे लक्ष न देता लंके यांनी समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवावे, असे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

श्रावण मासानिमित्त भाळवणी येथील काेविड सेंटरमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनसेवेप्रसंगी इंदुरीकर महाराज बोलत होते.

इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले, या आरोग्य मंदिरातून एक माणूस बरा होऊन गेला, तर त्याच्या मुखातून पडणारा शब्द काशीच्या अमृतापेक्षाही मोठा आहे. गरिबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही, मात्र देवपण आल्याशिवाय राहत नाही. हजारो रुग्णांना कोरोनाचे उपचार देणारे नीलेश लंके हे त्यांच्यासाठी आमदार नाहीत, तर त्यांच्यासाठी देव आहेत, हे कधीही लक्षात ठेवा. मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा असते. चांगल्या ठिकाणी केलेले काम कधीही दुप्पट होते. आज हॉस्पिटल विकत घेणारी माणसे होती. महिनाभर डॉक्टर ठेवणारे लोक होते. रुग्णाच्या वजनाइतके पैसे देणारेही लोक होते. मात्र ते रुग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहुणे, संपत्ती, ऐश्वर्य कामाला येत नाही. मात्र चांगले कर्म वाया जात नाही. पुण्याला थोडा उशीर आहे, पण फळ निश्चित आहे, ते म्हणाले.

----

तिसरी लाट रुग्णांना लुटणाऱ्यांसाठी

कोरोनाची लाट गरिबांसाठी नव्हे, तर गरिबांना लुटणाऱ्यांसाठी येणार आहे. कोरोना साथीमुळे माणसे भांबावली. त्यांनी डॉक्टरची पदवी पाहिली नाही. तज्ज्ञ पाहिला नाही. डॉक्टरांनीही रुग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रुग्णांना लुटले, त्यांचे वाटोळे होणार. गरिबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल, हे सांगता येणार नाही, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.

-----

चांगल्याला चांगले म्हणण्यात अडचण काय?

आपल्या लोकांना आपल्या माणसाचे चांगले झालेले कधीच सहन होत नाही. प्रवृत्तीच आहे ती. सध्या नकारात्मक विचार असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. समाज अधोगतीला जाण्याचे हेच कारण आहे. सकारात्मक विचार नाहीत. आपल्या लोकांनी आता तरी एकत्र जगणे ही काळाची गरज आहे. लंके यांनी मोठे काम केले. काही करता आले नाही तरी, कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले.