शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST

पारनेर : समाजाचे चांगले करणे हेच आमदार लंके यांचेे काम आहे. चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त, ...

पारनेर : समाजाचे चांगले करणे हेच आमदार लंके यांचेे काम आहे. चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त, तितका माणूस मोठा. तुकोबारायांना सर्वांनी त्रास दिला, ते जगद्गुरू बनले. ज्ञानेश्वर ज्ञानीयांचा राजा बनले. शिवाजी महाराज छत्रपती बनले, असे सांगत, टीकाकारांकडे लक्ष न देता लंके यांनी समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवावे, असे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

श्रावण मासानिमित्त भाळवणी येथील काेविड सेंटरमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनसेवेप्रसंगी इंदुरीकर महाराज बोलत होते.

इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले, या आरोग्य मंदिरातून एक माणूस बरा होऊन गेला, तर त्याच्या मुखातून पडणारा शब्द काशीच्या अमृतापेक्षाही मोठा आहे. गरिबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही, मात्र देवपण आल्याशिवाय राहत नाही. हजारो रुग्णांना कोरोनाचे उपचार देणारे नीलेश लंके हे त्यांच्यासाठी आमदार नाहीत, तर त्यांच्यासाठी देव आहेत, हे कधीही लक्षात ठेवा. मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा असते. चांगल्या ठिकाणी केलेले काम कधीही दुप्पट होते. आज हॉस्पिटल विकत घेणारी माणसे होती. महिनाभर डॉक्टर ठेवणारे लोक होते. रुग्णाच्या वजनाइतके पैसे देणारेही लोक होते. मात्र ते रुग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहुणे, संपत्ती, ऐश्वर्य कामाला येत नाही. मात्र चांगले कर्म वाया जात नाही. पुण्याला थोडा उशीर आहे, पण फळ निश्चित आहे, ते म्हणाले.

----

तिसरी लाट रुग्णांना लुटणाऱ्यांसाठी

कोरोनाची लाट गरिबांसाठी नव्हे, तर गरिबांना लुटणाऱ्यांसाठी येणार आहे. कोरोना साथीमुळे माणसे भांबावली. त्यांनी डॉक्टरची पदवी पाहिली नाही. तज्ज्ञ पाहिला नाही. डॉक्टरांनीही रुग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रुग्णांना लुटले, त्यांचे वाटोळे होणार. गरिबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल, हे सांगता येणार नाही, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.

-----

चांगल्याला चांगले म्हणण्यात अडचण काय?

आपल्या लोकांना आपल्या माणसाचे चांगले झालेले कधीच सहन होत नाही. प्रवृत्तीच आहे ती. सध्या नकारात्मक विचार असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. समाज अधोगतीला जाण्याचे हेच कारण आहे. सकारात्मक विचार नाहीत. आपल्या लोकांनी आता तरी एकत्र जगणे ही काळाची गरज आहे. लंके यांनी मोठे काम केले. काही करता आले नाही तरी, कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले.