शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शेतकरी संघटनेच्या रडारवर आता थोरात कारखाना; ऊस दरासाठी संगमनेरमध्ये आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:51 IST

थोरात सहकारी साखर कारखान्याने केवळ २३०० रुपये उचल दिली. त्यामुळे ऊसउत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष आहे. १ जानेवारीपर्यंत उसाला पहिली उचल २ हजार ५५० रुपये इतकी न दिल्यास थोरात कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिला.

संगमनेर : सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील सहकारी साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल २८०० ते ३१०० रुपये दिली. राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने २०१७-१८ या गळीत हंगामासाठी केवळ २३०० रुपये उचल दिली. त्यामुळे ऊसउत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष आहे. १ जानेवारीपर्यंत उसाला पहिली उचल २ हजार ५५० रुपये इतकी न दिल्यास थोरात कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिला.कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दशरथ सावंत बोलत होते. थोरात सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रेसर आहे. परंतु इतर दुबळ्या कारखान्याच्या तुलनेत या कारखान्याने पहिली उचल अडीच हजार रुपयांपेक्षा कमी दिली. प्रवरानगर व संगमनेर येथील सहकारी साखर कारखाने जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बाबतीत दबाब तंत्राचा वापर करतात. त्यामुळेही परिणामी त्यांनाही उसाचा पहिली उचल कमी द्यावी लागते. कोल्हापूर भागातील शेतकºयांनी साखर सम्राटांना धारेवर धरून उसाला एफ.आर.पी. प्रमाणे पहिली उचल मिळवून दिली. असेच आंदोलन येथे उभे करावे लागणार आहे. थोरात कारखान्याने नव्या कारखान्याच्या उभारणीसाठी ३०० कोटींच्या आसपास गुंतवणूक केली. मात्र, शेतकºयांच्या घामाला दाम देण्यासाठी तुम्ही कोणती गुंतवणूक केली? असा सवाल सावंत यांनी केला.निवेदनावर दीपक वाळे, रामराव गुंजाळ, शिवाजी वाळे, दीपक थोरात, वैभव कर्पे, रामचंद्र डुबे, पाटीलबुवा सावंत, दीपक काकड, मनोहर मालुंजकर, अजिंक्य डोंगरे, अरुण थोरात, अरविंद देशमुख, भास्कर नाईकवाडी, नानासाहेब थोरात, सोमनाथ खताळ, गुलाब कडलग आदींच्या सह्या आहेत.

शिक्षणसंस्था शेतक-यांच्या नावावर करा

राज्यातील साखरसम्राटांनी उसाच्या पैशांवर शिक्षणसंस्था काढल्या. शेतक-यांच्या उसाला जर हमीभाव देता येत नसेल, तर तुमच्या शिक्षणसंस्था शेतक-यांच्या मालकीच्या करा. या संस्थांमधून मिळणा-या पैशांतून आम्ही उसाला एफआरपीप्रमाणे भाव देऊन साखर कारखाने चालवून दाखवू. आमचा कुणालाही विरोध नाही. सहकार टिकविणे हा आमचा मूळ उद्देश आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाने सर्व शेतक-यांचा प्रातिनिधीक भावनांचा सहानभूतिपूर्वक विचार करावा, असेही दशरथ सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात