शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे मुला-मुलींचे सैराट झालं जी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 23:33 IST

सुदाम देशमुख, अहमदनगर काही दिवसांनी लग्न झाल्याची वार्ता....लग्न करून कोर्टापुढे उभे... पालकांचा नाईलाज... अशा प्रकरणांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे.

सुदाम देशमुख, अहमदनगरआधी बेपत्ता म्हणून तक्रार... नंतर अपहरणाचा गुन्हा.... काही दिवसांनी लग्न झाल्याची वार्ता....लग्न करून कोर्टापुढे उभे... पालकांचा नाईलाज... अशा प्रकरणांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. दोन वर्षात तीनशेपेक्षा जास्त मुला-मुलींनी पळवून जाऊन लग्न केले आहे. अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर महिनाभरातच मुले विवाह करून घरी येत आहेत. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे सैराट प्रेम मात्र पालकांची डोकेदुखी ठरली आहे.सैराट चित्रपटाने सध्या प्रत्येकाला याड लावलं आहे. सैराटमधील प्रेमकथा गावोगावी बघायला मिळते आहे. शहरात त्याचे प्रमाण जास्त आहे. कॉलेजमध्ये शिकायला जाणारी मुले-मुली ओळखीनंतर एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत. त्यांच्या प्रेमाची वार्ता घरातील मंडळी, नातेवाईक यांना कळाल्यानंतर मुले घरातून पळून जात आहेत. मुला-मुलींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांना अशा घटनांमुळे धक्काच बसतो आहे. मुलगी पळून गेल्यानंतर हातावर हात ठेवून बसणे नको म्हणून मुलीचे पालक पोलीस ठाण्यात आधी बेपत्ता झाल्याची तक्रार देतात. तीन दिवसानंतर मुलगी मिळाली नाही, तर पालकांच्या हट्टापायी पोलिसांना अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागतो. तब्बल महिना किंवा दोन महिन्यांनी मुले सापडतात किंवा थेट लग्न करून पोलीस ठाण्यात हजर होतात. मात्र त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते आणि पालक त्यावेळी हतबल झालेले असतात. जातीमधील मुलगा असेल तर संमती देवून लग्नही उरकून टाकले जाते. मात्र जातीबाहेर लग्न झाल्यास त्यांचे पालक मुला-मुलींशी कायमचे संबंध तोडून टाकत असल्याचे वास्तव या घटनांमधून समोर आले आहे. नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात ३१० मुले-मुली पळून गेले आहेत. मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. मुलांच्या अपहरणामागे लग्नाशिवाय अन्य कारणे आहेत. मात्र मुलींच्या अपहरणाच्या घटनामांगे केवळ प्रेम प्रकरणाशिवाय दुसरे कारण नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.घरातील वातावरण मुलांसाठी पोषक नसते. घरात मुलांना प्रेम, जिव्हाळा मिळाला नाही की मुले समवयस्कांमध्ये प्रेम शोधतात. यंग जनरेशन एकत्र येते. मुले काल्पनिक जगात वावरतात. रोमँटिक होतात. एंजॉय एवढेच त्यांचे ध्येय बनते. त्यातून लग्नापर्यंत मजल जाते. बहुतांश प्रेम विवाह आंतरजातीय असतात. वास्तव जगात वावरताना सामाजिक-आर्थिक संघर्षातून पुन्हा घटस्फोटापर्यंत येतात. मुलांपासून तुटक राहणे-वागणे धोक्याचे आहे. मुलांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे. त्यांच्या भावना जपल्या पाहिजेत. त्यांच्या दैनंदिन कृतीवर लक्ष असावे.-डॉ. वसंत देसले, मानसशास्त्राचे अभ्यासक