शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

तीनशे मुला-मुलींचे सैराट झालं जी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 23:33 IST

सुदाम देशमुख, अहमदनगर काही दिवसांनी लग्न झाल्याची वार्ता....लग्न करून कोर्टापुढे उभे... पालकांचा नाईलाज... अशा प्रकरणांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे.

सुदाम देशमुख, अहमदनगरआधी बेपत्ता म्हणून तक्रार... नंतर अपहरणाचा गुन्हा.... काही दिवसांनी लग्न झाल्याची वार्ता....लग्न करून कोर्टापुढे उभे... पालकांचा नाईलाज... अशा प्रकरणांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. दोन वर्षात तीनशेपेक्षा जास्त मुला-मुलींनी पळवून जाऊन लग्न केले आहे. अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर महिनाभरातच मुले विवाह करून घरी येत आहेत. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे सैराट प्रेम मात्र पालकांची डोकेदुखी ठरली आहे.सैराट चित्रपटाने सध्या प्रत्येकाला याड लावलं आहे. सैराटमधील प्रेमकथा गावोगावी बघायला मिळते आहे. शहरात त्याचे प्रमाण जास्त आहे. कॉलेजमध्ये शिकायला जाणारी मुले-मुली ओळखीनंतर एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत. त्यांच्या प्रेमाची वार्ता घरातील मंडळी, नातेवाईक यांना कळाल्यानंतर मुले घरातून पळून जात आहेत. मुला-मुलींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांना अशा घटनांमुळे धक्काच बसतो आहे. मुलगी पळून गेल्यानंतर हातावर हात ठेवून बसणे नको म्हणून मुलीचे पालक पोलीस ठाण्यात आधी बेपत्ता झाल्याची तक्रार देतात. तीन दिवसानंतर मुलगी मिळाली नाही, तर पालकांच्या हट्टापायी पोलिसांना अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागतो. तब्बल महिना किंवा दोन महिन्यांनी मुले सापडतात किंवा थेट लग्न करून पोलीस ठाण्यात हजर होतात. मात्र त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते आणि पालक त्यावेळी हतबल झालेले असतात. जातीमधील मुलगा असेल तर संमती देवून लग्नही उरकून टाकले जाते. मात्र जातीबाहेर लग्न झाल्यास त्यांचे पालक मुला-मुलींशी कायमचे संबंध तोडून टाकत असल्याचे वास्तव या घटनांमधून समोर आले आहे. नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात ३१० मुले-मुली पळून गेले आहेत. मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. मुलांच्या अपहरणामागे लग्नाशिवाय अन्य कारणे आहेत. मात्र मुलींच्या अपहरणाच्या घटनामांगे केवळ प्रेम प्रकरणाशिवाय दुसरे कारण नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.घरातील वातावरण मुलांसाठी पोषक नसते. घरात मुलांना प्रेम, जिव्हाळा मिळाला नाही की मुले समवयस्कांमध्ये प्रेम शोधतात. यंग जनरेशन एकत्र येते. मुले काल्पनिक जगात वावरतात. रोमँटिक होतात. एंजॉय एवढेच त्यांचे ध्येय बनते. त्यातून लग्नापर्यंत मजल जाते. बहुतांश प्रेम विवाह आंतरजातीय असतात. वास्तव जगात वावरताना सामाजिक-आर्थिक संघर्षातून पुन्हा घटस्फोटापर्यंत येतात. मुलांपासून तुटक राहणे-वागणे धोक्याचे आहे. मुलांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे. त्यांच्या भावना जपल्या पाहिजेत. त्यांच्या दैनंदिन कृतीवर लक्ष असावे.-डॉ. वसंत देसले, मानसशास्त्राचे अभ्यासक