शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

पासष्टवर्षीय आजीने केला चोरट्यांना प्रतिकार

By admin | Updated: January 15, 2016 23:29 IST

आश्वी : वरवंडी (ता. संगमनेर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून साडेसहा तोळे सोन्यासह ५८ हजार रुपये घेऊन पोबारा केला. यात महिला मारहाणीत जखमी झाली आहे.

आश्वी : वरवंडी (ता. संगमनेर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून साडेसहा तोळे सोन्यासह ५८ हजार रुपये घेऊन पोबारा केला. यात महिला मारहाणीत जखमी झाली आहे.गुरुवारी मध्यरात्री १ वाजता सुमारास रंगनाथ दादा गागरे यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीचे गज तोडून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी पेटी शेतात नेऊन त्यात असलेले रोख ४६ हजार रुपये काढून घेतले. शेजारील खोलीत झोपलेल्या इंदुबाई गागरे (वय ६५) हिच्या गळ्यातील दीड तोळ्याची पोत काढत सुनबाई कुठे आहे, याची विचारणा केली. यावेळी इंदुबाईने चोरट्यांना मिठी मारत आरडाओरड सुरू करताच तिच्या हातावर पहारीचा घाव घालत तिचा गळा स्वेटरने आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील इतर लोक जागे झाल्याने तेथून पळ काढत आपला मोर्चा मारूती जिजाबा गारगे यांच्या वस्तीवर वळविला. घराचे काम सुरू असल्याने घरातील छोट्या खोलीत झोपलेल्या लोकांना ओलांडून कपाटातील रोख रक्कम बारा हजार रुपये व पाच तोळे सोने घेऊन पलायन केले. चोरट्यांची चाहूल लागताच मारूती गागरे यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र काही अंतरावर पाच ते सहा हत्यारबंद टोळके दिसल्याने ते आरडाओरड करत मागे वळाले. गावात सुरू असलेल्या जागरण गोंधळाचा कार्यक्रमामुळे आरडाओरड कोणाच्याही कानावर जात नसल्याने त्यांनी भ्रमणदूरध्वनीद्वारे सुभाष वर्पे यांना कल्पना दिली असता, त्यांनी गावातील तरुणांच्या साह्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. १७ ते १९ वयोगटातील या तरुणांच्या हातात लोखंडी गज, काठ्या अशी हत्यारे होती.उपसरपंच सुभाष वर्पे यांनी आश्वी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यानंतरही शुक्रवारी दुपारपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शंका निर्माण होत असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. माहिती मिळताच संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. ( प्रतिनिधी)