शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

तिखट -मीठ खाऊन दिवस काढू...पण आधी कोरोना गेला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:17 IST

दहिगाव बोलका : गावात जे काही विळे, खुरपे विकतो त्यातून आलेल्या पैश्यातून तेल, तिखट-मीठ घेऊन दिवस काढतोय. कामाच्या बदल्यात लोकही किमतीपेक्षा जास्तच गहू,तांदूळ देताहेत. लोकही मदतीचे हात पुढे करतात. नाहीत तिखट-मीठ खाल्ले तरी तरीही कधी एकदा हा रोग जातोय असं झालयं"सुभाष पडूळकर काकुळतीने सांगत होता.

दिनेश जोशीदहिगाव बोलका : गावात जे काही विळे, खुरपे विकतो त्यातून आलेल्या पैश्यातून तेल, तिखट-मीठ घेऊन दिवस काढतोय. कामाच्या बदल्यात लोकही किमतीपेक्षा जास्तच गहू,तांदूळ देताहेत. लोकही मदतीचे हात पुढे करतात. नाहीत तिखट-मीठ खाल्ले तरी तरीही कधी एकदा हा रोग जातोय असं झालयं"सुभाष पडूळकर काकुळतीने सांगत होता.गेल्या एक महिन्यापासून लाडगाव (ता.वैजापूर) येथील सुभाष भिमराव पडूळकर येथील महादेव मंदीराजवळ थांबला आहे. स्वत: जवळील एक मालवाहू रिक्षातून तो कुटूंब काबिला घेऊन हे गाव, ते गाव करीत येथे आला आहे. घिसाडी हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय. हेच त्याचे उत्पन्नाचे साधन. एक महिन्यापूर्वी तो येथे आला. सुरवातीचे काही दिवस धंदाही व्यवस्थित सुरू होता. विशेषत: सोंगणीचा हंगाम सुरू असल्याने विळे शेवटन्याचे काम तसेच नवीन विळे तयार करण्याचे काम सुरू होते. हे व्यावसायिक एका गावात धंद्यात थोडी मंदी आली की लगेच पुढच्या गावाची वाट धरतात. सुभाषलाही पुढील गावात जायचे होते. पण संचारबंदी सुरू झाल्याने त्याला पुढील गावात जाता येईना. त्याला ग्रामपंचायतीनेही गाव सोडण्यास मनाई केली. त्यामुळे तो सध्या येथेच महादेव मंदीराच्या परीसरात मुक्कामी आहे. त्याचे कुटुंबात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. कोणी काही आणून दिलेले नाही परंतू विक्री करायला गेलो की लोक किमतीपेक्षा थोडे जास्तच देतात. त्यामुळे बरे चालू आहे. परंतू हे संकट लवकर जावे, असे मनापासून वाटते.अशी प्रार्थना त्याने समोरील महादेव मंदीराकडे पाहून केली.