शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
2
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
3
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
4
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
5
सोन्या-चांदीचा ऐतिहासिक भडका, एका दिवसात चांदी १४,१४३ रुपयांनी महागली; Gold मध्येही तेजी, पाहा नवे दर
6
"ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
7
IT कंपनीत ५ वर्षे काम, पण पगार वाढण्याऐवजी घटला! जावा डेव्हलपरची 'Reddit' पोस्ट व्हायरल
8
पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले
9
'बिनविरोध' निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा; हायकोर्टाने मनसेची याचिका फेटाळली
10
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
11
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
12
जीवघेणा शेवट! जिच्यावर प्रेम केलं, तिचे आधीच होते २ बॉयफ्रेंड; सत्य समजताच 'तो' हादरला अन्...
13
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
14
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
15
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
16
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
17
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
18
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
19
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
20
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
Daily Top 2Weekly Top 5

या ‘तीन’ गोष्टीने वाढते इम्युनिटी, कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:10 IST

कोरोनाचा रुग्ण बरा होऊन घरी परतला जातो, तेव्हा त्याला तीन बाबींची अंमलबजावणी करण्याचा कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. शेवग्याच्या शेंगाची भाजी, कच्चे टोमॅटो आणि गरम पाणी सतत पित रहा, असे सांगितले जाते. याशिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबतही सांगण्यात येते, असे एका बऱ्या झालेल्या रुग्णाने सांगितले.

सुदाम देशमुख

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होऊन घरी जाणाºया रुग्णांचेही मोठे प्रमाण आहे. हे प्रमाण तब्बल ८१ टक्केइतके आहे. बाधितांची संख्या एकीकडे वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची दुसरीकडे संख्या वाढत आहे. यामुळे केवळ १७ टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.बरे झालेल्या ८१ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने ते पाच ते सात दिवसांच्या आतच घरी जात असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज पाचशेपर्यंत जाते. त्यामुळे जिल्ह्यात भितीदायक वातावरण आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणा सांगत आहे.

अशा लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तेथे त्यांची चहा, नाश्ता, जेवण, व्यायामाची व्यवस्था केली जाते. इम्युनिटी वाढविणारी औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णाला पाच दिवस कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. पाच दिवसानंतर आणखी पाच ते सात दिवस घरी थांबण्याचासल्ला दिला जातो. त्यानंतर तो रुग्ण दहा दिवस होम क्वारंटाईन असतो. बारा दिवसानंतर त्याला समाजात वावरण्याची परवानगी दिली जाते.जून, जुलैमध्ये कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या पाचशे ते एक हजारांच्या आत होती. जुलैच्या मध्यापासून ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत ही संख्या वाढून थेट १७ हजारांच्यावर गेली आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. मात्र बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ८१ टक्क्यांच्यावर गेल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेचाही जीव भांड्यात पडला आहे.----------------सुरवातीच्या काळात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार कसे करावेत, याबाबत डॉक्टरांकडे फारसे अनुभव नव्हते. आता उपचार पद्धतीत सुधारणा झाली आहे. तसेच ९० टक्के रुग्णांना लक्षणेही आढळून येत नाहीत. तरीही अशा पॉझिटिव्ह रुग्णांना इम्युनिटी वाढविण्याची औषधेही उपलब्ध झाली असून ती दिली जात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिमाण म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ही चांगली बाब आहे.-डॉ. सुनील पोखरणा, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या