शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

या ‘तीन’ गोष्टीने वाढते इम्युनिटी, कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:10 IST

कोरोनाचा रुग्ण बरा होऊन घरी परतला जातो, तेव्हा त्याला तीन बाबींची अंमलबजावणी करण्याचा कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. शेवग्याच्या शेंगाची भाजी, कच्चे टोमॅटो आणि गरम पाणी सतत पित रहा, असे सांगितले जाते. याशिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबतही सांगण्यात येते, असे एका बऱ्या झालेल्या रुग्णाने सांगितले.

सुदाम देशमुख

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होऊन घरी जाणाºया रुग्णांचेही मोठे प्रमाण आहे. हे प्रमाण तब्बल ८१ टक्केइतके आहे. बाधितांची संख्या एकीकडे वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची दुसरीकडे संख्या वाढत आहे. यामुळे केवळ १७ टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.बरे झालेल्या ८१ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने ते पाच ते सात दिवसांच्या आतच घरी जात असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज पाचशेपर्यंत जाते. त्यामुळे जिल्ह्यात भितीदायक वातावरण आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणा सांगत आहे.

अशा लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तेथे त्यांची चहा, नाश्ता, जेवण, व्यायामाची व्यवस्था केली जाते. इम्युनिटी वाढविणारी औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णाला पाच दिवस कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. पाच दिवसानंतर आणखी पाच ते सात दिवस घरी थांबण्याचासल्ला दिला जातो. त्यानंतर तो रुग्ण दहा दिवस होम क्वारंटाईन असतो. बारा दिवसानंतर त्याला समाजात वावरण्याची परवानगी दिली जाते.जून, जुलैमध्ये कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या पाचशे ते एक हजारांच्या आत होती. जुलैच्या मध्यापासून ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत ही संख्या वाढून थेट १७ हजारांच्यावर गेली आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. मात्र बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ८१ टक्क्यांच्यावर गेल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेचाही जीव भांड्यात पडला आहे.----------------सुरवातीच्या काळात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार कसे करावेत, याबाबत डॉक्टरांकडे फारसे अनुभव नव्हते. आता उपचार पद्धतीत सुधारणा झाली आहे. तसेच ९० टक्के रुग्णांना लक्षणेही आढळून येत नाहीत. तरीही अशा पॉझिटिव्ह रुग्णांना इम्युनिटी वाढविण्याची औषधेही उपलब्ध झाली असून ती दिली जात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिमाण म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ही चांगली बाब आहे.-डॉ. सुनील पोखरणा, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या