शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या वर्षात एकही भूमिपूजन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन दिले, ते चार वर्षातच पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. दोन वर्षे पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन दिले, ते चार वर्षातच पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. पुढील दोन वर्षांत सर्व प्रस्तावित कामे पूर्ण करण्यात येतील. शेवटच्या वर्षात एकही भूमिपूजन करणार नाही, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

खासदार विखे म्हणाले, नगर-शिर्डी रस्त्यासाठी गेली दहा वर्षे राज्य सरकारकडे भीक मागत होतो; परंतु राज्य सरकारने निधी दिला नाही. भाजप सरकारमध्ये खासदार झालो. शहरातील प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघाला. या कामात आता कोणताही अडथळा नाही. नगर- शिर्डी महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले होते. या कामासाठी केंद्र सरकारने ५०० कोटी मंजूर केले आहेत. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे काम पुढील महिन्यात सुरू होईल. नगर करमाळा रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर आहेत. बाह्यवळण रस्त्यासाठी ७५० कोटी मंजूर झाले असून, या कामाला पुढील महिन्यांत सुरुवात होईल.

सुरत- चेन्नई ग्रीन फील्ड हा राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातून सोलापूर मार्गे चेन्नईला जाणार आहे. केंद्र शासनाच्या अत्मनिर्भर योजनेंतर्गत जिल्ह्याला ४५ कोटी मंजूर झाले आहेत. यामध्ये शेवगाव पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात मोठे प्रकल्प उभे राहणार आहेत. देशातील एक हजार बाजार समित्या ई-बाजारशी जोडल्या जाणार आहेत. बाजार समित्यांची परवानगी लागणार असून, जिल्ह्यातील बाजार समितीचे संमतीपत्र सरकारला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

...

उड्डाणपुलाच्या नावाबाबतचा निर्णय महापालिकेचा

उड्डाणपुलाच्या नावाबाबतचा मुद्दा उपस्थित होत असल्याकडे पत्रकारांनी विखे यांचे लक्ष वेधले असता भाजपाचे शहराध्यक्ष भय्या गंधे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, खासदार विखे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने भूसंपादन मार्गी लागले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू असून, नाव देण्याचा विषय महापालिकेच्या अखत्यारित येतो.

..

व्हीआरडीबाबत आता राजनाथ सिंहच बोलतील

येथील व्हीआरडी स्थलांतरीत होणार नाही, हे वेळोवेळी सांगितलेले आहे. याबाबत संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही झालेली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची वेळ मागितली आहे. येत्या ९ एप्रिल रोजी ते नगर दौऱ्यावर येतील, त्यावेळी तेच व्हीआरडीबाबत सांगतील, असे विखे यांनी सांगितले.

....