शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

शेवटच्या वर्षात एकही भूमिपूजन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन दिले, ते चार वर्षातच पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. दोन वर्षे पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन दिले, ते चार वर्षातच पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. पुढील दोन वर्षांत सर्व प्रस्तावित कामे पूर्ण करण्यात येतील. शेवटच्या वर्षात एकही भूमिपूजन करणार नाही, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

खासदार विखे म्हणाले, नगर-शिर्डी रस्त्यासाठी गेली दहा वर्षे राज्य सरकारकडे भीक मागत होतो; परंतु राज्य सरकारने निधी दिला नाही. भाजप सरकारमध्ये खासदार झालो. शहरातील प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघाला. या कामात आता कोणताही अडथळा नाही. नगर- शिर्डी महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले होते. या कामासाठी केंद्र सरकारने ५०० कोटी मंजूर केले आहेत. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे काम पुढील महिन्यात सुरू होईल. नगर करमाळा रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर आहेत. बाह्यवळण रस्त्यासाठी ७५० कोटी मंजूर झाले असून, या कामाला पुढील महिन्यांत सुरुवात होईल.

सुरत- चेन्नई ग्रीन फील्ड हा राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातून सोलापूर मार्गे चेन्नईला जाणार आहे. केंद्र शासनाच्या अत्मनिर्भर योजनेंतर्गत जिल्ह्याला ४५ कोटी मंजूर झाले आहेत. यामध्ये शेवगाव पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात मोठे प्रकल्प उभे राहणार आहेत. देशातील एक हजार बाजार समित्या ई-बाजारशी जोडल्या जाणार आहेत. बाजार समित्यांची परवानगी लागणार असून, जिल्ह्यातील बाजार समितीचे संमतीपत्र सरकारला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

...

उड्डाणपुलाच्या नावाबाबतचा निर्णय महापालिकेचा

उड्डाणपुलाच्या नावाबाबतचा मुद्दा उपस्थित होत असल्याकडे पत्रकारांनी विखे यांचे लक्ष वेधले असता भाजपाचे शहराध्यक्ष भय्या गंधे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, खासदार विखे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने भूसंपादन मार्गी लागले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू असून, नाव देण्याचा विषय महापालिकेच्या अखत्यारित येतो.

..

व्हीआरडीबाबत आता राजनाथ सिंहच बोलतील

येथील व्हीआरडी स्थलांतरीत होणार नाही, हे वेळोवेळी सांगितलेले आहे. याबाबत संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही झालेली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची वेळ मागितली आहे. येत्या ९ एप्रिल रोजी ते नगर दौऱ्यावर येतील, त्यावेळी तेच व्हीआरडीबाबत सांगतील, असे विखे यांनी सांगितले.

....