शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दररोज ९ दशलक्ष घनफूट पाण्याची होते वाफ

By admin | Updated: May 19, 2016 00:02 IST

अहमदनगर : अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मुळा जलाशयातील दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे़ पिण्याच्या पाण्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक आहे़

अहमदनगर : अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मुळा जलाशयातील दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे़ पिण्याच्या पाण्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाण्यापेक्षा दुप्पट पाणी बाष्पीभवनाव्दारे हवेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार पाटबंधारे विभागाच्या अहवालावरून समोर आला आहे़ दररोज २५ कोटी लीटर पाण्याची वाफ होत आहे़जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्याची भिस्त मुळा धरणावर आहे़ उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै अखेरपर्यंतचे नियोजनही करण्यात आले आहे़ पाणी पातळी खालावल्याने जिल्हा प्रशासनही पाण्यावर लक्ष ठेवून आहे़ मुळा धरणात एकूण ६ टीएमसी पाणीसाठा आहे़ हे सर्व पाणी पिण्यासाठी राखीव आहे़ धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे़ दिवसभरात १४ दशलक्ष घनफुटाने पाणी पातळी खोल जात आहे़ त्यापैकी साडेनऊ ते दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे़म्हणजे दररोज पिण्यासाठी अवघे ४ दशलक्ष घनफूट इतकेच पाणी लागते़ पण, त्यापेक्षा अधिक पाणी बाष्पीभवनाव्दारे हवेत जाते़ अचानक वाढलेली उष्णता हे त्यामागील कारण आहे़ मागील वर्षी मे महिन्यात बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याचे प्रमाण सात दशलक्ष घनफूट इतके होते़ धरणात पुरेसे पाणी असते, त्यावेळी लांबपर्यंत पसरलेले असते़ यंदा मात्र तशी स्थिती नाही़ पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे आकारमान कमालीचे कमी झाले आहे़ असे असूनही बाष्पीभवन होण्याचे प्रमाण अधिक असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ मुळा धरणावर नगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या आठ पाणी योजना आहेत़ पाणीपातळी खोल गेल्याने शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट झाली होती़ त्यामुळे महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी नवीन अत्याधुनिक विद्युत पंप बसविले़ पंप बसविल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ झाली आहे़ पण, इतर पाणी योजनांची स्थितीही चिंताजनक आहे़ (प्रतिनिधी)