शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

दररोज ९ दशलक्ष घनफूट पाण्याची होते वाफ

By admin | Updated: May 19, 2016 00:02 IST

अहमदनगर : अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मुळा जलाशयातील दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे़ पिण्याच्या पाण्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक आहे़

अहमदनगर : अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मुळा जलाशयातील दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे़ पिण्याच्या पाण्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाण्यापेक्षा दुप्पट पाणी बाष्पीभवनाव्दारे हवेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार पाटबंधारे विभागाच्या अहवालावरून समोर आला आहे़ दररोज २५ कोटी लीटर पाण्याची वाफ होत आहे़जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्याची भिस्त मुळा धरणावर आहे़ उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै अखेरपर्यंतचे नियोजनही करण्यात आले आहे़ पाणी पातळी खालावल्याने जिल्हा प्रशासनही पाण्यावर लक्ष ठेवून आहे़ मुळा धरणात एकूण ६ टीएमसी पाणीसाठा आहे़ हे सर्व पाणी पिण्यासाठी राखीव आहे़ धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे़ दिवसभरात १४ दशलक्ष घनफुटाने पाणी पातळी खोल जात आहे़ त्यापैकी साडेनऊ ते दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे़म्हणजे दररोज पिण्यासाठी अवघे ४ दशलक्ष घनफूट इतकेच पाणी लागते़ पण, त्यापेक्षा अधिक पाणी बाष्पीभवनाव्दारे हवेत जाते़ अचानक वाढलेली उष्णता हे त्यामागील कारण आहे़ मागील वर्षी मे महिन्यात बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याचे प्रमाण सात दशलक्ष घनफूट इतके होते़ धरणात पुरेसे पाणी असते, त्यावेळी लांबपर्यंत पसरलेले असते़ यंदा मात्र तशी स्थिती नाही़ पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे आकारमान कमालीचे कमी झाले आहे़ असे असूनही बाष्पीभवन होण्याचे प्रमाण अधिक असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ मुळा धरणावर नगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या आठ पाणी योजना आहेत़ पाणीपातळी खोल गेल्याने शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट झाली होती़ त्यामुळे महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी नवीन अत्याधुनिक विद्युत पंप बसविले़ पंप बसविल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ झाली आहे़ पण, इतर पाणी योजनांची स्थितीही चिंताजनक आहे़ (प्रतिनिधी)