शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुळा धरणात सव्वा महीना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:41 IST

दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

राहुरी: दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आज उजवा कालवा बंद करण्यात आला आहे. शेवटच्या उन्हाळी अवर्तनात ४० दिवसांमध्ये ५ हजार दशलक्ष्यघनफुट पाण्याचा वापर झाला आहे. सद्यस्थितीत धरणात पिण्यायोग्य पाण्याचा साठा ३१३ दलघफु असून हा पाणीसाठा महीनाभर पुरेल, असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात ४ हजार ८१३ दलघफु पाणी शिल्लक आहे़ मृत पाणी साठा ४५०० दलघफु आहे. दररोज ८ दलघफु पाणी खर्च होत आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही.मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली २७९ पाणी वापर सहकारी संस्था आहे. पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातुन शेतीसाठी पाणी वाटप करण्यात आले आहे. उजव्या कालव्याखाली किती क्षेत्र भिजले याबाबत पाटबंधारे खात्याकडे आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. सलग दोन वर्ष मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. गेल्या वर्षी धरणावर ७८० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे धरणाच्या ११ मो-यातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर यंदा पावसाचे प्रमाण घटण्याची चिन्हे आहेत.  त्यामुळे यंदा मुळा धरण भरणार का याबाबत शेतक-यांमध्ये उत्सुकता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी