शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या आंदोलन केले सुरू
4
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
5
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
6
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
7
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
8
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
9
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
10
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
11
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
12
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
13
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
14
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
15
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
16
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
17
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
18
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
19
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
20
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला

अख्या गावात उरल्या अवघ्या अकरा बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 14:03 IST

कुकडी लाभक्षेत्रातील बागायतदारांचे गाव अशी ओळख असलेल्या लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील शेती  व्यवसायाची पाण्याअभावी वाताहत झाली आहे. सततची दुष्काळी स्थिती, पशुखाद्याचे वाढते दर आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गावात अवघ्या ११ बैलजोड्या उरल्या आहेत. हे वास्तव शनिवारी म्हणजे भाद्रपदी बैल पोळ्याच्या दिवशी उघड झाले. 

बाळासाहेब काकडे ।  श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रातील बागायतदारांचे गाव अशी ओळख असलेल्या लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील शेती  व्यवसायाची पाण्याअभावी वाताहत झाली आहे. सततची दुष्काळी स्थिती, पशुखाद्याचे वाढते दर आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे गावात अवघ्या ११ बैलजोड्या उरल्या आहेत. हे वास्तव शनिवारी म्हणजे भाद्रपदी बैल पोळ्याच्या दिवशी उघड झाले. लोणीव्यंकनाथ गावची लोकसंख्या १२ हजार आहे. मनमाड-फलटण राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव आहे. या गावाची शेती क्षेत्रही मोठे आहे. गावचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी बैलांच्या सहायाने शेतकरी शेतीची मशागत, पेरणी करीत होते. त्यामुळे ५०० हून अधिक बैलजोड्या गावात होत्या. दिवसेंदिवस येथील नियमित शेतीसाठी मिळणारे पाणी कधी तरी मिळू लागले. त्याचा फटका शेती उद्योगाला बसला. तसेच काही वर्षांच्या अंतराने सारखा दुष्काळही पडत आहे. पशुखाद्याचा भावही वाढला आहे. त्यामुळे शेतक-यांना बैलजोड्या सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. तरी काही शेतकरी परंपरा कायम राखण्याठी तर काहीजण हौसेखातर बैलजोडी सांभाळत आहेत.  लोणी व्यंकनाथ येथे भाद्रपदी पोळा साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी येथे बैलजोड्या पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. पण मिरवणुकीसाठी गावात अवघ्या अकराच बैलजोड्या आल्या. बैलजोड्या कमी झाल्याने बैल सजविण्याचा अगर बैलांसाठी लागणारे दैनंदिन साहित्यांचा व्यवसाय संपला आहे. ही चिंतेची बाब आहे. काही दिवसांनी बैलांचे आठवडे बाजारही बंद पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.  बैलजोडी सांभाळणे अवघड.. बैलजोडी सांभाळणे सध्या खूप अवघड झाले आहे. दररोज काम नसेल तर चा-याचा खर्चही परवडत नाही. त्यामुळे बैलजोडी सांभाळणे शेतक-यांना परवडत नाही. तरी हौस म्हणून काही शेतकरी बैलजोडी पाळीत आहेत ही वस्तुस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांना निसर्गाचीही साथ मिळत नाही. शेती व्यवसायातही अनंत अडचणी आहेत, असे येथील शेतकरी उद्धव काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर