शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

...तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 10:27 IST

काँग्रेस पक्षाला त्याग आणि देश सेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनविले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले आहे.

श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देश सेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनविले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडासाफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले आहे.

श्रीगोंदा येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या कॉग्रेस बळकटीकरण कार्यक्रमात नागवडे अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले, जातीधर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना फडकावून भाजपाने सत्ता काबीज केली. मोदी सरकारने एलएआयसी, रेल्वे, विमानतळ विकायला काढली आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा दर ढासळला आहे.

आमदार सुधीर तांबे म्हणाले, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने निष्ठा तत्व असलेले असलेले नेतृत्व मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेशी बांधलकी संवाद ठेवला तर देशात सत्तांतर होऊ शकते.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाबासाहेब भोस, आदेश शेंडगे यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, अरुण पाचपुते, समीर बोरा, बाबासाहेब इथापे, धनसिंग भोयटे, सुरेश लोखंडे, सतिश मखरे, हेमंत नलगे, राजेश लोखंडे, सीमा गोरे, निसार बेपारी, संतोष कोंथिबीरे, सुरेखा लकडे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. सूत्रसंचलन ॲड. अशोक रोडे केले. आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण