शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

...तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून ...

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून उपाययोजना गतीने राबविल्या पाहिजेत. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करण्याची कठोर कारवाई करा, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी दिले आहेत. जिल्ह्याचा रुग्ण बाधित होण्याचा दर असाच वाढत राहिला, तर जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंध लावावे लागतील, असा इशाराही त्यांनी बैठकीत दिला.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते.

बैठकीत गमे म्हणाले, जिल्ह्यात गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर पथकांमार्फत लक्ष ठेवा. ठिकठिकाणी नाकाबंदी करावी. ज्या आस्थापना कोविडसुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नाहीत, त्या बंद करण्याची कारवाई करावी. कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना सवलत देऊ नका. रुग्णसंख्या या प्रमाणात वाढत राहिली, तर त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करा, असे त्यांनी स्पष्ट केले.

----

गर्दीचे कार्यक्रम बंद करा

जिल्ह्यात यापुढे गर्दी जमविणारे कार्यक्रम होणार नाहीत, याची दक्षता तालुकास्तरीय यंत्रणांनी घ्यावी. असे कार्यक्रम कऱणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने चाचण्या होतील, यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी. दररोज होणाऱ्या चाचण्या, बाधित आदींची माहिती संबंधितांनी दररोज पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यापुढे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.