शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या कोठेवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या

By अरुण वाघमोडे | Updated: August 11, 2023 18:23 IST

आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का? जाणून घ्या सत्य

अरुण वाघमोडे, अहमदनगर: साहेब गावातील रस्ते खराब झालेत, गावाचा डोंगरी विकास योजनेत समावेश करा, पाण्यासाठी तलाव व्हावा तसेच घरकुल योजना आणि आमच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी कार्यन्वित करा, अशा मागणी पाथर्डी तालुक्यातील दुर्गम भागातील कोठेवाडी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्याकडे केली.

महसूल सप्ताहतंर्गत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर व महसूल सहायक अशोक मासाळ यांनी चार दिवसांपूर्वी कोठेवाडी व परिसरातील आदिवासी वस्तींवर भेट देेत ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत तलाठी राजू मेरड उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी गावात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. यावेळी कोठेवाडीचे सरपंच संजय चितळे यांच्यासह दत्तू कोठे, विष्णू कोठे, गोरख कोठे, मुरलीधर कोठे, किशोर पवार, गिन्यानदेव कोठे, पोलीस पाटील वसंत वाघमारे यांनी गावातील प्रश्न मांडले. गावात पोलीस चौकी करावी, डोंगरी विकास योजनेत समावेश करावा, पाझर तलाव संपादनाचे काम व्हावे, रेशनचा प्रश्न मार्गी लावावा, रस्ते व्हावेत आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागगणी ग्रामस्थांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी ग्रामस्थांसह तरुणांना मार्गदर्शन करत रोजगरासाठी कौशल्य आत्मसात करावे, महसूलस्तरावरून गावातील प्रश्न मार्गी लावण्यास प्राधन्य देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मासाळ यांनी देखील स्थानिक युवक व ज्येष्ठांशी संवाद सात शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली.

आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का?

शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात मात्र, यंत्रनेच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागात योजना पोहोचतात की, नाही यांची माहिती उपजिल्हाधिकारी क्षीरसारग यांनी घेतली. कोठेवाडीपासून जवळ असलेल्या आदिवासी वस्तीवर त्यांनी भेट देऊन तेथील पोपट भवरे, कौशल्य भवरे, सतीश भवरे, अशोक भवरे यांच्याशी संवाद ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. वाड्यावरील झोपड्यांबाबत प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याच्या सचूना यावेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी तलाठी मेरड यांनी दिल्या. तसेच घरकुल योजना, संजय गांधी योजना, शिधापत्रिका, पी एम किसान व आदिवासी विकासाच्या योजना पूर्ण क्षमतेने वाडीवस्तींवर पोहोचविण्याबाबत क्षीरसागर यांनी संबंधित आधिकाऱ्यांना आदेश दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर