शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर, कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी

By चंद्रकांत शेळके | Updated: October 13, 2023 19:35 IST

माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षारॅली काढण्यात आली.

अहमदनगर: महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, सरकारने मुक्त परवाना धोरण बंद करून नवीन परवाने देणे तात्काळ थांबवावे, १५ वर्षे झालेल्या जुन्या रिक्षा टॅक्सी तात्काळ भंगारात काढाव्यात, अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षारॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले होते. दरम्यान, रिक्षाचालकांनी बंद पाळल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, मोर्चाला आमदार संग्राम जगताप यांनीही पाठिंबा दिला. यावेळी रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, कुमार वाकळे, प्रमुख सल्लागार कॉम्रेड बाबा अरगडे, उपाध्यक्ष दत्ता वामन, अशोक औशिकर, नितीन पवार, विलास कराळे, लतीफ शेख, सुधाकर साळवे, गणेश आटोळे, नासिर खान, माऊली जाधव, विजय गव्हाळे आदींसह रिक्षा चालक- मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले की, शहरांमध्ये रिक्षा चालक नागरिकांना वाहतुकीची सेवा प्रामाणिकपणे देत असतात. मात्र त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे ती सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर