शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रिक्षांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर, कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी

By चंद्रकांत शेळके | Updated: October 13, 2023 19:35 IST

माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षारॅली काढण्यात आली.

अहमदनगर: महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, सरकारने मुक्त परवाना धोरण बंद करून नवीन परवाने देणे तात्काळ थांबवावे, १५ वर्षे झालेल्या जुन्या रिक्षा टॅक्सी तात्काळ भंगारात काढाव्यात, अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षारॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले होते. दरम्यान, रिक्षाचालकांनी बंद पाळल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, मोर्चाला आमदार संग्राम जगताप यांनीही पाठिंबा दिला. यावेळी रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, कुमार वाकळे, प्रमुख सल्लागार कॉम्रेड बाबा अरगडे, उपाध्यक्ष दत्ता वामन, अशोक औशिकर, नितीन पवार, विलास कराळे, लतीफ शेख, सुधाकर साळवे, गणेश आटोळे, नासिर खान, माऊली जाधव, विजय गव्हाळे आदींसह रिक्षा चालक- मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले की, शहरांमध्ये रिक्षा चालक नागरिकांना वाहतुकीची सेवा प्रामाणिकपणे देत असतात. मात्र त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे ती सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर