शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 25, 2016 00:09 IST

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़ मात्र दहा तालुक्यांत जेमतेमच ४५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण पुढे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ धरण पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी पावसाचा जोर वाढला़ त्यामुळे भंडारदरा व मुळा धरणातील पाण्याच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली़ धरण निम्मे भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली़ पुढील आॅगस्टच्या १५ तारखेपर्यंत मुळा धरण १०० टक्के भरते, असा अनुभव आहे़ जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला़ पण धरणे निम्मेच आहे़ त्यामुळे धरणांतून शेतीसाठी पाणी देता येईल, अशी स्थिती सध्या तरी नाही़ जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे़ तुलनेने पाऊस कमी आहे़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार अकोले, श्रीरामपूर, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांत ५० टक्केहून अधिक पाऊस पडला़ पण, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, राहाता, राहुरी, नगर, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यांत जेमतेम ४५ टक्के पाऊस पडला़ निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांची संख्या अधिक आहे़ढगाळ वातावरण आहे़ पावसाच्या सरींवर सरी सुरू आहेत़ त्यामुळे खरिपाची पिके तग धरून आहेत़ त्यात पावसाच्या हलक्या सरींमुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे़ तण कमालीचे वाढले आहे़ खुरपणीसाठी माणसे मिळत नाहीत़ सततच्या पावसाने खुरपणीच्या कामात अडथळा येत असल्याने बळीराजाही हैराण आहे़ कमी पाऊस त्यात वाढलेले तण, यामुळे पिकेही धोक्यात आहेत़ मागील वर्षी दक्षिण नगर जिल्ह्यातील जुलैअखेर निम्म्याहून अधिक पाऊस पडला होता़ तुलनेत यंदा दक्षिणेतील जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यांत कमी पाऊस पडला़याउलट स्थिती उत्तर नगर जिल्ह्यात आहे़ मागील वर्षी उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले वगळता संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यांत कमी पाऊस पडला होता़ यंदा जुलैअखेर उत्तर नगर जिल्ह्यात ३० टक्केहून अधिक पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण त्यानंतरच्या पिकांचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ पोषक वातावरण असूनही पावसाची टक्केवारी वाढत नसल्याने मोठ्या पावसाठी परतीच्या मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार काय, अशी भिती व्यक्त होत आहे़