शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

नगरमध्ये तापमान ४१ अंशावर; तापमानाचा उच्चांक, उष्माघातापासून करा बचाव

By साहेबराव नरसाळे | Updated: May 14, 2023 16:34 IST

उन्हाळा जाणवलाच नव्हता. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही ८ मेपर्यंत पावसाचे वातावरण होते. ८ मेच्या रात्रीही पाऊस झाला.

अहमदनगर : मागील तीन दिवसांपासून उन्हाचा पारा अत्यंत वाढला असून, तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे. शनिवारी पारा ४३ अंशावर पोहोचला होता. तर रविवारी दुपारी ४१ अंशावर पारा होता. अशा तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुपारी उन्हात फिरू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा जाणवलाच नव्हता. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही ८ मेपर्यंत पावसाचे वातावरण होते. ८ मेच्या रात्रीही पाऊस झाला. त्यामुळे या वर्षीचा उन्हाळा पावसातच जातो की काय, अशी परिस्थिती असतानाच ९ मेपासून अचानक उन्हाची तीव्रता एकदम वाढली. शुक्रवारी व शनिवारी ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान पोहोचले. शनिवारी तापमानाने उच्चांक गाठत ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली. ४० अंशाच्या वर तापमान गेल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा तीव्र उन्हात फिरणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.ही आहेत उष्माघाताची लक्षणे

भरपूर घाम येणे, त्वचा कोरडी किंवा गरम होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाची गती वाढणे, श्वसन दर वाढणे, जास्त तहान लागणे, डोकेदुखी होणे, स्नायू पेटके, शुद्ध हरपणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत....तर होऊ शकतो मृत्यू

उष्माघातामुळे मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना सूज येऊ शकते. मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते. उष्माघातावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. उष्माघातामुळे अनेकदा मृत्यू ओढवल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTemperatureतापमान