शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नगरमध्ये तापमान ४१ अंशावर; तापमानाचा उच्चांक, उष्माघातापासून करा बचाव

By साहेबराव नरसाळे | Updated: May 14, 2023 16:34 IST

उन्हाळा जाणवलाच नव्हता. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही ८ मेपर्यंत पावसाचे वातावरण होते. ८ मेच्या रात्रीही पाऊस झाला.

अहमदनगर : मागील तीन दिवसांपासून उन्हाचा पारा अत्यंत वाढला असून, तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे. शनिवारी पारा ४३ अंशावर पोहोचला होता. तर रविवारी दुपारी ४१ अंशावर पारा होता. अशा तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दुपारी उन्हात फिरू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा जाणवलाच नव्हता. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही ८ मेपर्यंत पावसाचे वातावरण होते. ८ मेच्या रात्रीही पाऊस झाला. त्यामुळे या वर्षीचा उन्हाळा पावसातच जातो की काय, अशी परिस्थिती असतानाच ९ मेपासून अचानक उन्हाची तीव्रता एकदम वाढली. शुक्रवारी व शनिवारी ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान पोहोचले. शनिवारी तापमानाने उच्चांक गाठत ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली. ४० अंशाच्या वर तापमान गेल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा तीव्र उन्हात फिरणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.ही आहेत उष्माघाताची लक्षणे

भरपूर घाम येणे, त्वचा कोरडी किंवा गरम होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाची गती वाढणे, श्वसन दर वाढणे, जास्त तहान लागणे, डोकेदुखी होणे, स्नायू पेटके, शुद्ध हरपणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत....तर होऊ शकतो मृत्यू

उष्माघातामुळे मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना सूज येऊ शकते. मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते. उष्माघातावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. उष्माघातामुळे अनेकदा मृत्यू ओढवल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTemperatureतापमान