शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांची शिकवण आणि आपले आचरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

------------- तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानतंतर सारनाथ येथे आपल्या पहिल्या प्रवचनातून त्यांनी अखंड समजाला उद्धाराकडे नेण्याचा मार्ग आपल्या ...

-------------

तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानतंतर सारनाथ येथे आपल्या पहिल्या प्रवचनातून त्यांनी अखंड समजाला उद्धाराकडे नेण्याचा मार्ग आपल्या पाच जुन्या सोबत्यांना सांगितला. हे प्रवचन देताना बुद्ध असे सांगतात की, माणूस आणि त्याचे जगातील नाते हा या धम्माचा (बुद्ध धमाचा) उद्देश आहे. कोणत्याही समाजव्यवस्थेमध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू ठेवून त्याचा सर्वागीण उद्धार हाच त्या व्यवस्थेचा अंतिम उद्देश असला पाहिजे. परंतु भारतासारख्या देशामध्ये जाती, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्था व्यक्ती-व्यक्तीमध्ये विषमता व भेदभाव निर्माण करते. बुद्धांनी आपल्या पहिल्याच उपदेशामध्ये मानवी समाजात असलेल्या विषमतेचे वर्णन करताना सांगितले की, मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे; याचाच अर्थ दुःख आणि दारिद्र्य ही व्यक्तीला आणि परिणामी समाजाला अधोगतीकडे नेणारे मार्ग आहेत. बुद्धांच्या या वाक्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास करून या उपदेशाची समकालीन समाजव्यवस्थेशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘दुःख’ या शब्दाच्या माध्यमातून समाजात अस्तित्वात असलेल्या पिळवणुकीचा संदर्भ दिलेला आहे. त्यांच्या मते समाजातील व्यक्तीमध्ये आसक्ती (हाव) हा पिळवणुकीचा मूळ पाया आहे. कोणत्याही गोष्टीविषयी असणारी हाव (लालच) समाजातील एका वर्गाला मालकी हक्क देते तर दुसऱ्या वर्गाला शोषणयुक्त जीवनपद्धती जगण्यासाठी भाग पाडते. यावरून आपणास असे लक्षात येते की कोणत्याही संसाधनाची मालकी किंवा समाजव्यवस्थेवर असणारी मालकी ही एक प्रकारची आसक्ती असून त्यामुळे समाजामध्ये भेदभाव आणि विषमता निर्माण होते.

बुद्धांच्या मते खासगी मालकी समाजातील एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख (शोषण/पिळवणूक) देते. बुद्ध फक्त समाजातील या विषमतेविषयीचे विश्लेषण करून थांबले नाही तर त्यांनी ती विषमता नष्ट करण्यासाठी सदाचाराचा मार्ग सांगितला. हा सदाचाराचा मार्ग समाजातील अन्याय दूर करून समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यास मदत होईल असे त्यांना वाटत असे. म्हणून त्यांनी मैत्री व प्रज्ञा या दोन गोष्टींवर भर दिलेला आहे. मैत्रीच्या माध्यमातून समाजामध्ये बंधुभाव निर्माण होण्यास मदत होईल कारण मैत्रीमध्ये कुणीही उच्च किंवा कनिष्ठ नसतो, सर्वांना समान अधिकार, समान संधी व समान स्थान प्राप्त होतात. तर समाजातील अज्ञान (अविद्या) नष्ट करून जोपर्यंत व्यक्ती सुज्ञ होत नाही तोपर्यंत तो नेहमी दुःखात जगत राहील. याचाच अर्थ जोपर्यंत व्यक्ती आपल्या पिळवणुकीविषयी जागरूक होत नाही तोपर्यंत समाजामध्ये विषमता कायम टिकून राहील. म्हणून बुद्धांनी आपल्या त्रिसरणामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान हे प्रज्ञेला दिले आहे. प्रज्ञा म्हणजे सम्यक ज्ञान. या सम्यक ज्ञानाच्या माध्यमातून समाजात वावरत असताना चांगल्या-वाईट, चूक-बरोबर, न्याय-अन्याय, कुशल-अकुशल, इ. कृतीमध्ये फरक करून त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करणे म्हणजेच बुद्धांच्या मते प्रज्ञा होय. बुद्धांच्या मते "ज्या प्रमाणे माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे प्रज्ञेचीही व्यक्तीला आवश्यकता असते".

शिक्षण हे फक्त अर्थार्जन करण्याचे साधन नसून ते व्यक्तीच्या दु:खाचा अंत करणारे एक क्रांतिकारी शस्त्र आहे हे युवकामध्ये रूढ होण्याची गरज आहे. एक धर्म म्हणून नव्हे तर एक जीवन जगण्याची पद्धत म्हणून बुद्धांच्या विचारसरणीच्या आधारे आपले आचरण करण्याची नितांत गरज आहे. बुद्धांनी दिलेल्या मूल्यांची व विचारसरणीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून समज करून आजच्या तरुण पिढीने सम्यक मार्ग आत्मसात करणे गरजेचे आहे.

-प्रदीप जारे

(लेखक सी. एस. आर. डी. अहमदनगर येथे समाजकार्याचे सहायक प्राध्यापक आहेत.)