शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी शिक्षकांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:10 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद आवारात आंतरजिल्हा बदलीसाठी सुरू असलेले प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषद आवारात आंतरजिल्हा बदलीसाठी सुरू असलेले प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते आणि शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची चर्चा झाली. यात आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासनाची मागणी केली. मात्र, ती देण्यास असमर्थता दर्शवल्याने शिक्षकांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी २०७ ना हरकत प्राप्त शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हा परिषदेत सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे आणि आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या शिष्टमंडळात सोमवारी चर्चाही झाली होती. मात्र, यावेळी चर्चेला उपस्थित असणारे शिक्षक आणि आंदोलनकर्त्या शिक्षकांचा संबंध नसल्याचा दावा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केला आहे. सोमवारी रात्री ९ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी २०७ शिक्षकांना पदस्थापनेचा आदेश देण्याची मागणी केली. त्यावर बिनवडे यांनी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची बिंदूनामावली तयार करून पेसा, नॉन पेसा आणि नाशिक येथील मागासवर्गीय कक्षातून यादी तपासून आणावी लागेल, असे स्पष्ट सांगितले. हे आंदोलनकर्त्या शिक्षकांना मान्य नसल्याने शिक्षकांचे उपोषण सुरूच आहे. (प्रतिनिधी)बनवाबनवी...आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी सहा शिक्षकांचा गट तयार करण्यात आला आहे. यात चंद्रकांत गट, सचिन झगडे, विकास निसळ, सोनाली रसाळ, सुनीता ढवळे, सुमती चौरे यांचा समावेश आहे. या शिक्षकांशिवाय प्रशासनाने आंदोलनाबाबत कोणाशीही चर्चा करून नये, अशी विनंती केली आहे. आंदोलनात स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश असून रात्रीच्यावेळी लाईट आणि स्वच्छता गृह उपलब्ध करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. ४सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत बनवाबनवीचा प्रकार घडला. आंदोलनकर्त्यांच्यावतीने जे शिष्टमंडळ बिनवडे यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते, त्यात ना हरकत प्रमाणपत्र मिळालेल्या २०७ शिक्षकांपैकी एकही शिक्षक नव्हता. ज्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही, ते शिक्षक आमच्या बदल्याला विरोध करीत असल्याचा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे. यामुळे आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची बनवाबनवी सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मोठे अर्थकारण सुरू असल्याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू होती.