शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

जत तालुक्यातून शिक्षकाचे कुटुंब बेपत्ता, मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील : पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश

By चंद्रकांत शेळके | Updated: July 2, 2023 17:42 IST

गेल्या पाच दिवसांपासून हे दोन लहान मुले व पत्नी बेपत्ता असून पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

अहमदनगर : मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेली पत्नी व दोन लहान मुले जत (जि. सांगली) तालुक्यातून बेपत्ता झाली असल्याची तक्रार शिक्षक सुभाष कचरे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे. पाच दिवसांनंतरही अद्याप या कुटुंबाचा शोध लागलेला नाही.

सुभाष दत्तात्रय कचरे (वय ३५, मूळ राहणार पळसुंदे, ता. अकोले, जि. अहमदनगर) हे गेल्या काही वर्षांपासून जत तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आपली पत्नी सोनाली (वय ३० वर्षे), मुले अर्णव (वय ६ वर्षे) व शिवम (वय ३.५ वर्षे) यांच्यासोबत जतमध्ये राहतात. दि. २८ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते हायस्कूलवर शिकवण्यासाठी घरातून निघून गेले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांची पत्नी सोनाली हिस फोन करून मुलांना शाळेत सोडले का? असे त्यांनी विचारले. त्यावर मुलांना शाळेत सोडायलाच चालले आहे, असे तिने सांगितले. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. शाळेतून घरी आल्यानंतर माझे कुटुंब घरी नव्हते. शेजारी चौकशी केली असता दुपारपासून घर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेच कचरे यांनी जत पोलिसांत कुटुंब बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

गेल्या पाच दिवसांपासून हे दोन लहान मुले व पत्नी बेपत्ता असून पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. शाळेत गेलेली मुले व पत्नी गायब कसे झाले, याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावी, अशी मागणी या शिक्षकाने पोलिसांकडे केली आहे.सर्व नातेवाइकांकडे विचारपूससुभाष कचरे यांनी सर्व नातेवाइकांकडे याबाबत विचारणा केली, मात्र अद्याप या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. त्यांचे बरेचसे नातेवाईक जतमध्ये आले असून कसून शोधमोहीम सुरू आहे.सीसीटीव्ही, लोकेशन तपासण्याची मागणीकचरे यांची पत्नी मुलांना शाळेत सोडायला गेली होती. परंतु ती घरी आलीच नाही. शाळेत चौकशी केली असता मुले शाळेत आलीच नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे तिघे कोठे गेले? त्यांचे कोणी अपहरण केले की आणखी काय? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासून, तसेच कचरे यांच्या पत्नीच्या मोबाइल लोकेशनवरून त्यांचा शोध लावावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.