शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

‘तनपुरे’चा बॉयलर कोण पेटविणार?

By admin | Updated: June 15, 2016 23:45 IST

सुधीर लंके, अहमदनगर राहुरीच्या डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर गत दोन वर्षे पेटला नाही. पण, सत्तेच्या प्रचाराचा बॉयलर मात्र चांगला धगधगला.

सुधीर लंके, अहमदनगरराहुरीच्या डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर गत दोन वर्षे पेटला नाही. पण, सत्तेच्या प्रचाराचा बॉयलर मात्र चांगला धगधगला. या कारखान्याची चावी मतदार कोणाच्या हाती सोपविणार याची जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे. ‘तनपुरे’च्या निवडणुकीवर पुढची बरीच राजकीय समीकरणे ठरणार आहेत. दिवंगत डॉ. बाबुराव तनपुरे यांनी या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. गावोगावी फिरुन त्यांनी कारखान्यासाठी भागभांडवल जमा केले. महिलांनी स्वत:चे दागिने या कारखान्यासाठी विकले. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फिरताना बाबुरावांच्या अशा अनेक आठवणी जागोजागी ऐकायला मिळतात. पण, राहुरीच्याच नेतेमंडळींना हा भरभक्कम वारसा नीट जपता आला नाही. ज्या कारखान्याने राज्यात कधीकाळी उच्चांकी भाव दिला, त्या कारखान्यावर आज ३०० कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा आहे. कारखान्याच्या निवडणुकीत प्रसाद तनपुरे, शिवाजी गाडे व शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांची ‘एकता’ एक्सप्रेस धावली. प्रवरेच्या डॉ. सुजय विखेंच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळ व सेवानिवृत्त कामगार आयुक्त सुभाषचंद्र येवले यांच्या नेतृत्वाखालील उत्कर्ष मंडळ असा तिरंगी सामना आहे. तीनही मंडळांनी प्रचारात कारखाना सुरू करण्याचा दावा केला आहे. प्रसाद तनपुरे व शिवाजी गाडे हे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढले. पण, राहुरीवर विखे यांचे बाह्य आक्रमण होत आहे, या मुद्यावर ते आता एकत्र आले. कारखाना जगविण्यापेक्षा त्यांना विखे यांची चिंता मोठी दिसते हे त्यांच्या भाषणांवरुन जाणवले. प्रसाद तनपुरेंऐवजी अरुण तनपुरे व प्राजक्त तनपुरे यांच्याकडे प्रचाराची बरीचशी सूत्रे होती. अरुण तनपुरे यांनी बाजार समितीचे मॉडेल यशस्वी केले आहे. तेच आता कारखानाही सुरळीत करतील, असे ठसविण्याचा प्रयत्न झाला. सुजय विखे हेही प्रचारात आक्रमक दिसले. ते राजकारणात नवीन आहेत. पण त्यांची भाषणे मुरब्बी राजकारण्यासारखी होती. अजित पवारांनी या मंडळींना मैदानात उतरविले आहे. आता कारखाना सुरु करायला निघालेली ही मंडळी इतके दिवस कोठे होती? हा प्रश्न त्यांनी राहुरीकरांना केला. सत्ता द्या, लगेच सभासदांची व कामगारांची देणी देऊन बॉयलर पेटवितो, असे त्यांनी जाहीरच केले.खासगी कारखाना चालतो मग सहकार कसा मोडीत निघतो, असा मुद्दा मांडत राधाकृष्ण विखे यांनी थेट ‘प्रसाद शुगर’ वर हल्ला केला. सुभाषचंद्र येवले यांनीही सर्वसामान्य शक्तीचा एक तिसरा पर्याय उभा केला. रायगड बँकेच्या माध्यमातून पैसा आणून आपण कारखाना सुरु करु, असा त्यांचा दावा आहे. राहुरीची ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित नाही म्हणूनच ती एवढी गाजली. राहुरीकरांच्या भांडणात यापूर्वी त्यांच्या हातून आमदारकी निसटली. आता कारखानाही आपल्या हातून जाणार, याची त्यांना भिती आहे. सुजय विखे हे नगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. सुभाष पाटील यांनी तसे राहुरीच्या सभेत जाहीरच करुन टाकले. त्यामुळे सुजय यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने बांधणी सुरु केलीय, असे म्हणण्यास वाव आहे. राहुरी कारखाना ताब्यात आला तर हा मतदारसंघच विखे यांच्या ताब्यात येणार आहे. त्यामुळेच राहुरीचे स्थानिक नेते धास्तावले आहेत. अर्थात सभासदांना आपले-बाहेरचे यापेक्षा कारखाना जगणे व उसाला भाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते कोणाला बॉयलर पेटविण्याची संधी देणार, हे गुरुवारी ठरेल. कर्डिले नेमके कोणाचे?आमदार शिवाजी शिवाजी कर्डिले यांच्या टोपीखाली दडलेय काय? याचा अंदाज कोणालाच येत नाही. या निवडणुकीतही त्यांनी धूर्तपणा केला. ‘जो जिंकेल त्याच्या पाठिशी मी राहणार’ असा भिंतीवरील तसबिरीत दिसणाऱ्या स्वामींसारखा अजब पवित्रा त्यांनी घेतला. कोणीही जिंका रिमोट माझ्याकडे राहणार, असे त्यांना ठसवायचे आहे. अर्थात ते खरोखरच तटस्थ आहेत की आतून कोणाला रसद पुरविणार, हे लवकरच स्पष्ट होईल. राहुरी कारखान्याला पात्रता नसताना जिल्हा बँकेने एवढे कोट्यवधीचे कर्ज कसे दिले? या मुद्याचा कर्डिले यांनी निवडणुकीत खुलासा करायला हवा होता. रामदास धुमाळ यांच्याकडेही ‘तनपुरे’ची सत्ता होती. मात्र, ते प्रचारात अलगद बाजूला राहिले.