शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जिल्ह्यात टँकर लॉबी : पाणी वाहतुकीत मूठभर संस्थांचीच मक्तेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:05 IST

दुष्काळाने होरपळत असलेल्या तालुक्यांमध्ये पाणी वाहतुकीसाठी जिल्हाप्रशासनाने निविदा मागविल्या होत्या़ पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही़

अण्णा नवथरअहमदनगर : दुष्काळाने होरपळत असलेल्या तालुक्यांमध्ये पाणी वाहतुकीसाठी जिल्हाप्रशासनाने निविदा मागविल्या होत्या़ पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही़ मुदतवाढ दिल्यानंतर मात्र संगमनेर व शिर्डी विभाग वगळता चारही विभागांसाठी निविदा आल्या़ संस्थांनी भरलेल्या निविदांचा अभ्यास केला असता पाणी वाहतुकीत ठराविक संस्थांचीच मक्तेदारी असल्याचे समोर आले आहे़पाणी वाहतुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक विभागासाठी सहा स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या होत्या़ दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने आॅक्टोबरमध्येच ही प्रक्रिया सुरू केली होती़ काम वाटप करताना स्पर्धा हा महत्वाचा निकष असतो़ निविदा भरण्याची मुदत २६ नोव्हेंबर होती़ पण, या काळात एकापेक्षा अधिक निविदा न आल्याने स्पर्धा झाली नाही़ त्यामुळे ४ डिसेंबरपर्यंत प्रथम मुदतवाढ दिली गेली़ मुदतवाढीनंतर पाथर्डीसाठी चार निविदा आल्या़ अन्य नगर, कर्जत आणि श्रीगोंदा -पारनेर, या विभागांसाठी प्रत्येकी तीन निविदा प्राप्त झाल्या़ शिर्डी व संगमनेर, विभागांसाठी एकही निविदा आली नाही़ मुदतवाढ दिल्यानंतर या विभागासाठी तीन निविदा आल्या़ एका संस्थेने किती निविदा भराव्यात, अशी कोणतीही अट निविदेत नव्हती़ याचा गैरफायदा उठवित एकाच संस्थेने दोन ते तीन विभागांसाठी निविदा भरलेल्या आहेत़ एकच संस्था दोन तालुक्यांना पाणीपुरवठा कशी करू शकते, हा अनुत्तरीत आहे़येथील गाडे ट्रान्सपोर्ट संस्थेने नगर व पाथर्डी, या दोन्ही विभागासाठी निविदा भरल्या़ या संस्थेने नगरसाठी २९२, तर पाथर्डीसाठी प्रतिटन २३५ रुपयांचा दर दिला़ श्रीरामपूर येथील लक्ष्मीमाता मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रोटक्टर्स संस्थेने नगरसाठी २३९, संगमनेर २४५, पाथर्डीसाठी प्रतिटन २६५ रुपये, असा दर दिला़ पारनेर येथील साई सहारा इन्फ्रा अ‍ॅण्ड फॅसिलिटी प्रा़ लि़ ने नगर व कर्जत तालुक्यासाठी एकसारखे २६०,तर संगनेरसाठी २४० रुपयांचे दर दिलेले आहेत़ जामखेड येथील विट उत्पादकांची मोटर वाहतूक संस्थेने कर्जत विभागासाठी निविदा भरताना २३५, तर श्रीगोंदा- पारनेरसाठी प्रतिटन २४० रुपयांचे दर दिले आहेत़ शेवगाव येथील श्रीगणेश सहकारी मोटार वाहतूक संस्थेने पाथर्डीसाठी २३५, तर कर्जत विभागासाठी प्रतिटन २५५ रुपये दर दिलेला आहे़नवीन संस्थांसाठी निविदेची दारे बंदजिल्हा परिषदेतही विविध कामे घेताना अनुभवाची अट होती़ परंतु, मूठभर संस्थांची मक्तेदारी वाढू लागल्याने जिल्हा परिषदेने ही अट रद्द केली़ जिल्हाप्रशासनाने मात्र अनुभवाची अट वाढवित एकप्रकारे मक्तेदारीला खतपाणी घातल्याचे दिसून येते़ त्यामुळे नवीन संस्थांची दारे बंद झाली आहेत.अनुभवाची अट एक वर्षावरून तीन वर्षेपाणी वाहतुकीत ठराविक संस्थांची मक्तेदारी होण्यामागे अनुभवाची अट, हे एक कारण आहे़ पाणी वाहतुकीची निविदा भरताना संबंधित संस्थेला या कामाचा तीन वर्षांचा अनुभव, असणे बंधनकारक आहे़ मागीलवर्षीपर्यंत एक वर्षांच्या अनुभवाची अट होती़ चालूवर्षी मात्र त्यात दोन वर्षांनी वाढ केल्याने नवीन संस्था निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकल्या नाहीत़ परिणामी वर्षानुवर्षे हे काम करणाऱ्या संस्थांनाच कामे मिळतील, अशी स्थिती आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर