शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

आचारसंहितेमुळे तमाशाचे फड संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 16:59 IST

राज्यातील लोकसभा निवडणुका व गावोगावी यात्रा, जत्रा एकाच वेळी आल्याने आचारसंहितेमुळे गावच्या जत्रेतील महाराष्ट्राची लोककला संकटात सापडली आहे.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : राज्यातील लोकसभा निवडणुका व गावोगावी यात्रा, जत्रा एकाच वेळी आल्याने आचारसंहितेमुळे गावच्या जत्रेतील महाराष्ट्राची लोककला संकटात सापडली आहे. संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंतच तमाशाला परवानगी दिली जाते. त्यामुळे एका बाजूला आचारसंहितेचा त्रास तर दुसरीकडे पोलिसांचा जाच, अशा दुहेरी संकटात तमाशा सापडला आहे. या आचारसंहितेमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा मुलगा कैलास विठाबाई नारायणगावकर यांना संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शंभर कलावंतांसह चार दिवस कार्यक्रमाअभावी एकाच ठिकाणी राहुटी देऊन रहावे लागले. यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली, असे त्यांनीसांगितले.

सध्या राज्यात सुमारे वीस हजार तमाशे व दीड लाख लोककलावंत आहेत. यात २०० तमाशांचे फड नोंदणीकृत आहेत. त्यातील २००० तमाशांचे फड मध्यम स्वरुपाचे आहेत. मध्यम स्वरुपाच्या तमाशात २० पेक्षा जास्त कलाकार असतात. तर त्यांच्या चार पट गाव तमाशे आहेत. गाव तमाशांमध्ये प्रामुख्याने आदिवासी, ठाकरी, कोकणी, खानदेशी, दशावतारी, नाचे अशा कलावंतांचा समावेश असतो.तमाशातील कलावंत हा राजकारणात व्होट बॅक ठरत नाही. इतर व्यावसायिक रंगभूमीला महामंडळ आहे. तमाशात वंचितांची संख्या मोठी आहे. त्यावर पोटपाणी चालणारे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. तमाशाच्या सांस्कृतिक विकासाचा अजेंडा ठरविण्यासाठी मालक, अभ्यासक, सावकारांनी एकत्र लढाई दिली तर गळचेपी होणार नाही. - डॉ. मिलिंद कसबे, तमाशाचे अभ्यासक.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर