शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी कामगारांची सरकारशी बोलणी फिस्कटली

By admin | Updated: September 30, 2024 13:40 IST

अहमदनगर : प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून संप पुकारलेल्या राज्यातील ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार युनियनची बुधवारी मुंबईत सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली़

अहमदनगर : प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून संप पुकारलेल्या राज्यातील ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार युनियनची बुधवारी मुंबईत सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ बैठकीत युनियनच्या १५ पैकी १४ मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले़ मात्र, मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास नसल्याचे सांगत मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावाणी होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्णयावर ठाम असल्याचे ऊस तोडणी कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी सांगीतले.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार युनियनने गेल्या तीन महिन्यांपासून बेमुदत संप पुकारला आहे़ या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील साखर संघाच्या कार्यालयात बैठक पार पडली़ या बैठकीला साखर संघाचे अध्यक्ष खासदार मोहिते पाटील, साखर आयुक्त शर्मा, कामगार मंत्र्यांचे मुख्य सचिव व ऊसतोडणी कामगार युनियनचे सात संचालक उपस्थित होते़ युनियनची मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली़ यावेळी सहकार मंत्र्यांनी १५ पैकी १४ मागण्या येत्या आठ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ कामगार युनियनने मात्र, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतरच बेमुदत संप मागे घेणार असल्याचा इशारा यावेळी दिला़ (प्रतिनिधी)प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार युनियनने गेल्या तीन महिन्यांपासून बेमुदत संप पुकारला आहे़ तीन महिन्यानंतर सहकार मंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले़ आमच्या १५ पैकी १४ मागण्या पूर्ण करण्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासनही दिले आहे़ मात्र आश्वासनाची आम्हाला शाश्वती नाही़ मागण्यांच्या अंमलबजावणीवर जोपर्यंत स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़ राज्यात ऊस तोडणी कामगार युनियनचे सुमारे १६ लाख सभासद असून, हे सर्व संपात सहभागी झाले आहेत़ त्यातच कारखान्याचा गाळप हंगाम जवळ आल्याने शासन युनियनसोबत तडजोडीच्या मानसिकतेत आहे़