शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

ठोस निर्णय घ्या, अन्यथा जानेवारीत दिल्लीमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय ...

अहमदनगर : केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारी महिन्यात दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. विविध मागण्यांचे निवेदन हजारे यांनी केंद्र सरकारला पाठविले आहे.

शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पन्नाच्या खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने तो आत्महत्या करीत आहे. प्रत्येक राज्यात कृषीमूल्य आयोग आहेत. या कृषीमूल्य आयोगामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांचे वेगवेगळ्या पिकांचे शास्त्रज्ञ आहेत. ते संबंधित पिकाचा लागवडीपासून ते बाजारात नेईपर्यंतचा हिशेब काढून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवितात. केंद्रीय कृषीमूल्य आयोग हा केंद्र सरकारच्या कृषीमंत्र्यांच्या अखत्यारित असल्यामुळे राज्यातील आलेल्या कृषीमूल्य आयोगाच्या अहवालामध्ये १० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत कारण नसताना कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळत नाही. स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशीनुनार शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळायला हवा. त्याप्रमाणे भाव मिळावा यासाठी हमीभाव जाहीर केला. तसा भाव आम्ही देतो, असे केंद्र सरकार सांगते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात ते पाहिले पाहिजे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी २०१७ पासून विविध ठिकाणी चार आंदोलने केली. शासनाने शेतकऱ्यांबाबतच्या मागण्या मान्य करण्यासाठी आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.

--

चर्चा आता थांबवा

याबाबत नुकतेच विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. भागवत कराड यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही राळेगण येथे येऊन चर्चा केली. परंतु, आता चर्चा, आश्वासने थांबवा, ठोस निर्णय घ्या, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. अन्यथा, जानेवारीमध्ये दिल्लीत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.