शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

ठोस निर्णय घ्या, अन्यथा जानेवारीत दिल्लीमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय ...

अहमदनगर : केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारी महिन्यात दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. विविध मागण्यांचे निवेदन हजारे यांनी केंद्र सरकारला पाठविले आहे.

शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पन्नाच्या खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने तो आत्महत्या करीत आहे. प्रत्येक राज्यात कृषीमूल्य आयोग आहेत. या कृषीमूल्य आयोगामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांचे वेगवेगळ्या पिकांचे शास्त्रज्ञ आहेत. ते संबंधित पिकाचा लागवडीपासून ते बाजारात नेईपर्यंतचा हिशेब काढून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवितात. केंद्रीय कृषीमूल्य आयोग हा केंद्र सरकारच्या कृषीमंत्र्यांच्या अखत्यारित असल्यामुळे राज्यातील आलेल्या कृषीमूल्य आयोगाच्या अहवालामध्ये १० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत कारण नसताना कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळत नाही. स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशीनुनार शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळायला हवा. त्याप्रमाणे भाव मिळावा यासाठी हमीभाव जाहीर केला. तसा भाव आम्ही देतो, असे केंद्र सरकार सांगते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात ते पाहिले पाहिजे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी २०१७ पासून विविध ठिकाणी चार आंदोलने केली. शासनाने शेतकऱ्यांबाबतच्या मागण्या मान्य करण्यासाठी आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.

--

चर्चा आता थांबवा

याबाबत नुकतेच विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. भागवत कराड यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही राळेगण येथे येऊन चर्चा केली. परंतु, आता चर्चा, आश्वासने थांबवा, ठोस निर्णय घ्या, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. अन्यथा, जानेवारीमध्ये दिल्लीत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.